शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर सर्वाधिकार विद्यमान कार्यकारिणीकडेच

By admin | Updated: October 23, 2016 01:10 IST

किमान सात दशकांपासून शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या मूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापनावर एका प्रतिष्ठित व्यक्तीनेच प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याने

न्यायालयाचे दोन्ही निकाल: मूल शिक्षण प्रसारक मंडळातील वादचंद्रपूर: किमान सात दशकांपासून शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या मूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापनावर एका प्रतिष्ठित व्यक्तीनेच प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. तेव्हापासून उलट सुलट चर्चेला पेव फूटले होते. न्यायालयाने प्रतिवादीचे म्हणणे ऐकून घेऊन गेल्या २० दिवसांत दोन वेळा निकाल दिला. हे दोन्ही निकाल अ‍ॅड.वासाडे यांच्या नेतृत्वातील विद्यमान मंडळाच्या बाजूने लागले. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीकडेच प्रशासकीय व आर्थिक अधिकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक वि. तु. नागपुरे यांच्यानंतर संस्थेचे सर्व अधिकार अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांना बहाल करण्यात आले. यासाठी नागपुरे यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. तसा ठराव झाल्यानंतर अ‍ॅड. वासाडे यांनी सर्वाच्या सहकार्याने संस्था नावारुपास आणली. परंतु मध्यंतरी अ‍ॅड. वासाडे व इतरांना अधिकार नसल्याचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, संस्थेचा चेंज रिपोर्टदेखील दाखल करण्यात आला. न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या पहिल्याच निर्णयात विद्यमान कार्यकारिणीला अधिकार असल्याचे स्पष्ट आहेत. त्या निर्णयानुसार, सहायक धर्मदाय आयुक्तांनी २००२ चे अपील मान्य करीत अ‍ॅड. वासाडे यांच्या कार्यकारिणीला मान्यता दिली. तशी नोंद शेड्यूल एक मध्ये सहायक आयुक्तांनी घेतली. त्यावर सेशन कोर्टात अपील दाखल झाल्यानंतर धर्मदाय आयुक्तांचा आदेश रद्द करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. या अपील क्रमांक ८११ मध्ये जिल्हा न्यायाधिशाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याच बरोबर अ‍ॅड. वासाडे यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीला संस्थेचा कारभार चालविण्याचा अधिकार बहाल केला. दुसरीकडे संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे यांनी २००९ व २०१५ मध्ये दाखल केलेल्या चेंज रिपोर्टवर सहा महिन्यांच्या आत निर्णय द्यावा, असेही आदेश दिले. तोपर्यंत उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगत आदेश कायम राहील, असे प्रलंबित असलेल्या चेंज रिपोर्ट संदर्भात विरुद्ध बाजू नसल्यामुळे व आक्षेप नोंदविणारा तो प्रतिष्ठित सभासद नसल्यामुळे चेंज रिपोर्टचा निकाल घटनेप्रमाणे होणार हे आता सिद्ध झाले आहे. या प्रकरणी २१ सप्टेंबरला निकाल लागल्यानंतर त्या आदेशात दुरुस्ती करावी म्हणून पुन्हा उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्या अर्जावर न्यायालयाने १० आॅक्टोबरला निर्णय दिला असून या निर्णयात २००९ व २०१५ चेचेंज रिपोर्टमधील समिती संस्थजेचा कारभार पाहात आहे. त्या प्रतिवादीने कधीही विद्यमान कार्यकारिणी विरुद्ध तक्रार केलेली नसून व तशी माहिती कोर्टात उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा नवीन अर्जही फेटाळल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या या दोन्हीनिर्णयामुळे विद्यमान कार्यकारिणीलाच सर्व अधिकार असल्याचे आता स्पष्ट झाले असल्याची स्पष्टोक्ती अ‍ॅड. वासाडे यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)