शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

तळोधीचे स्मशानघाट पाणी टंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: April 30, 2016 00:59 IST

पाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हालघनश्याम नवघडे नागभीडपाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तळोधी येथे तर गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे.तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून येथे तळोधीच्या नावे एक आणि बाम्हणीच्या नावे एक असे दोन स्मशानघाट आहेत. हे दोन्ही स्मशानघाट जवळजवळ असून गावापासून दोन किलोमिटर अंतरावर बोकडडोह नाल्यावर आहेत. या दोन पैकी बाम्हणी स्मशानभूमीवर तळोधी ग्रामपंचायतीने एक विंधन विहिरीची व्यवस्था केली असली तरी या विंंधन विहीरीचा दांडा गेल्या अनेक दिवसांपासून तुटला असलञयाने ही विंधन विहीर बंद पडून आहे.तळोधी स्मशानघाटावर विंधन विहिरीची व्यवस्था नसली तरी ग्रामपंचायतीने या ठिकाणी पाण्याची छोटी टाकी तयार करुन त्यावर नळकांडे लावले होते. पण हे नळकांडेसुद्धा अनेक दिवसांपासून बंद आहेत. तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. रोज येथे कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत असतो. त्यामुळे तळोधीवासियांना रोजच या स्मशानघाटावर जावे लागते.हे स्मशानघाट बोकडडोह नाल्यावर असले तरी यावर्षी कमी पावसामुळे हा नाला कोरडा पडला आहे. त्यामुळे अंत्यविधी करणाऱ्या व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची पाण्याविणा मोठीच परवड होत आहे. श्रीमंत व्यक्तीच्या घरचा अंत्यविधी असेल तर हे लोक पाण्याच्या कॅनची व्यवस्था करतात. पण गरीब व साधारण लोकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.नाला कोरडा पडल्याने आणि बाम्हणी स्मशान घाटाची विंधन विहिर बंद असल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाला नाही तर अंत्यविधिनंतर करण्यात येणाऱ्या विधिसाठी सुद्धा जे पाणी आवश्यक असते त्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तळोधी ग्रामपंचायतीने केवळ सिमेंटचे रस्ते तयार करण्यात व्यस्त न राहता गेल्या दिड वर्षापासून बाम्हणी स्मशान घाटात बंद असलेल्या हातपंपाकडे व तळोधी स्मशानघाटावरील बंद नळकांड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.स्मशानभूमीतील जलस्रोतांची काळजी घेणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. पण या कर्तव्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशी परिस्थितीनिर्माण झाली.- प्रा. उपेंद्र चिटमलवार, अध्यक्ष, तंमुस, तळोधीयाबद्दल तक्रारी आल्या आहेत. ग्रा.पं.च्या मार्फत ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न त्वरित केल्या जाईल.- विलास लांजेवार, सदस्य ग्रा.पं. तळोधी