शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

तळोधीचे स्मशानघाट पाणी टंचाईच्या सावटाखाली

By admin | Updated: April 30, 2016 00:59 IST

पाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हालघनश्याम नवघडे नागभीडपाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तळोधी येथे तर गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे.तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून येथे तळोधीच्या नावे एक आणि बाम्हणीच्या नावे एक असे दोन स्मशानघाट आहेत. हे दोन्ही स्मशानघाट जवळजवळ असून गावापासून दोन किलोमिटर अंतरावर बोकडडोह नाल्यावर आहेत. या दोन पैकी बाम्हणी स्मशानभूमीवर तळोधी ग्रामपंचायतीने एक विंधन विहिरीची व्यवस्था केली असली तरी या विंंधन विहीरीचा दांडा गेल्या अनेक दिवसांपासून तुटला असलञयाने ही विंधन विहीर बंद पडून आहे.तळोधी स्मशानघाटावर विंधन विहिरीची व्यवस्था नसली तरी ग्रामपंचायतीने या ठिकाणी पाण्याची छोटी टाकी तयार करुन त्यावर नळकांडे लावले होते. पण हे नळकांडेसुद्धा अनेक दिवसांपासून बंद आहेत. तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. रोज येथे कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत असतो. त्यामुळे तळोधीवासियांना रोजच या स्मशानघाटावर जावे लागते.हे स्मशानघाट बोकडडोह नाल्यावर असले तरी यावर्षी कमी पावसामुळे हा नाला कोरडा पडला आहे. त्यामुळे अंत्यविधी करणाऱ्या व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची पाण्याविणा मोठीच परवड होत आहे. श्रीमंत व्यक्तीच्या घरचा अंत्यविधी असेल तर हे लोक पाण्याच्या कॅनची व्यवस्था करतात. पण गरीब व साधारण लोकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.नाला कोरडा पडल्याने आणि बाम्हणी स्मशान घाटाची विंधन विहिर बंद असल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाला नाही तर अंत्यविधिनंतर करण्यात येणाऱ्या विधिसाठी सुद्धा जे पाणी आवश्यक असते त्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तळोधी ग्रामपंचायतीने केवळ सिमेंटचे रस्ते तयार करण्यात व्यस्त न राहता गेल्या दिड वर्षापासून बाम्हणी स्मशान घाटात बंद असलेल्या हातपंपाकडे व तळोधी स्मशानघाटावरील बंद नळकांड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.स्मशानभूमीतील जलस्रोतांची काळजी घेणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. पण या कर्तव्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशी परिस्थितीनिर्माण झाली.- प्रा. उपेंद्र चिटमलवार, अध्यक्ष, तंमुस, तळोधीयाबद्दल तक्रारी आल्या आहेत. ग्रा.पं.च्या मार्फत ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न त्वरित केल्या जाईल.- विलास लांजेवार, सदस्य ग्रा.पं. तळोधी