शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

जलयुक्त शिवारमुळे सागरा झाले सागर !

By admin | Updated: July 8, 2015 01:15 IST

कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.

३२५ एकर क्षेत्र संरक्षित ओलीत : ६ जुन्या सिमेंट बांधांमध्ये ३६ टीएमसी पाणीचंद्रपूर : कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. सह जुन्या सिमेंट बांध खोलीकरणामुळे शिवारातील शेतीला शाश्वत सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. जुन्या सिमेंट बांधामध्ये ३६ टीएमसी पाणी साठा असून ३२५ एकर क्षेत्रावर संरक्षीत ओलीत होणार आहे. पावसाच्या दडीमुळे पिकांना आवश्यक असलेले पाणी या बांधामधून प्राप्त होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता सध्या तरी मिटली आहे.सागरा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असून विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातही या गावचा समावेश आहे. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातंर्गत सागरा परिसरात ६४ शेततळे घेण्यात आली आहेत. हे शेततळे सद्या काठोकाठ भरली असून शेततळ्यात ७६ टीएमसी पाणीसाठा आहे. यावर्षी जलयुक्त शिवार मध्ये ६ जुने सिमेंट बांध खोलीकरण करण्यात आले असून या बांधामध्ये मुबलक पाणी साठल्याने पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होणार आहे.सागरा हे गाव कोरडवाहू क्षेत्रात येत असल्यामुळे या ठिकाणी सिंचनाच्या सोई अपुऱ्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात बांधण्यात आलेल्या ६४ शेततळ्यांमुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली. (स्थानिक प्रतिनिधी)