शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाग्यनगर, रामगिरी, गोंदिया, भुसावळ पॅसेंजर बल्लारशाह येथून चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संचालनामध्ये बरेच बदल केले आहेत. भाग्यनगरी, रामगिरी एक्स्प्रेस दररोज बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संचालनामध्ये बरेच बदल केले आहेत. भाग्यनगरी, रामगिरी एक्स्प्रेस दररोज बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत, पण आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, भाग्यनगरी, रामगिरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात आली आहे परंतु या गाड्या बल्लारशाहऐवजी कागजनगरपर्यंत चालविल्या जात आहेत. यामुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. बल्लारशाह येथून भाग्यनगरी आणि रामगिरी गाड्या पुन्हा सुरू करण्याची आणि गोंदिया पॅसेंजर, बल्लारशाह-वर्धा-भुसावळ पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी केली आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधीलाही निवेदन दिले आहे.

भाग्यनगरी, रामगिरी रेल्वे कागजनगरपर्यंत चालविली जात होती. चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी असोसिएशन बल्लारशाहच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्याकडे वारंवार मागणी करून भाग्यनगरी, रामगिरीचा विस्तार बल्लारशाहपर्यंत करण्यात आला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाच नव्हे तर यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांनाही फायदा होत होता. गोंदिया पॅसेंजर आणि बल्लारशाह-वर्धा-भुसावळ या दोन्ही गाड्या प्रवाशांच्या सोयीच्या होत्या. मात्र त्याही बंद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे.

भाग्यनगरी आणि रामगिरी एक्स्प्रेस कागजनगरऐवजी बल्लारशाहपर्यंत सुरू करण्याची आणि गोंदिया पॅसेंजर आणि बल्लारशाह-वर्धा-भुसावळ पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली आहे.