शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 12, 2017 02:10 IST

चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत.

नागरिक हैराण : ग्रामीण भागात बिकट परिस्थिती चंद्रपूर : चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. त्रासलेले नागरिक बुधवारी बुद्धजयंतीची सुटी असल्याने कोणाकडे तक्रारही नोंदवू शकत नव्हते. चंद्रपूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांमध्ये आणखीही बिकट परिस्तिथी आहे. चंद्रपुरात स्टेट बँक आॅफ इंडियाचे पाच एटीएम आहेत. बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदीचेही एटीएम कार्यरत आहेत. तसेच जवळच्या पडोली येथेही एक एटीएम आहे. परंतु बुधवार या सुटीच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या एटीएमवर फिरूनही रोख रक्कम मिळाली नाही. नागरिकांना एसबीआयच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्येच तेवढी रक्कम मिळाली. या एटीएमवर रक्कम मिळत असल्याने तेथे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत तेथे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नोटबंदी लागू झाल्यापासून चंद्रपूर शहरात रोख रकमेचा तुटवडा सुरू झाला आहे. मधल्या दोन महिन्यात व्यवहार सुरळीत झाले, असे वाटत असताना पुन्हा गेल्या आठवड््यापासून एटीएम केंद्र ‘आऊट आॅफ कॅश’ दाखविले जात आहेत. बँक आॅफ इंडियाचे एटीएम कायम ‘आऊट आॅफ कॅश’ अशी पाटी काचेच्या प्रवेशद्वारावर मिरवित असते. त्याबाबत बँकेचे अधिकारीही व्यवस्थित उत्तर देत नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. पाटण येथे बँकेत मनमानी पाटण : जिवती तालुक्यात एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा पाटण येथे आहे पूर्ण तालुक्याचा व्यवहार याच बँकेतून चालतो. तीन ते चार दिवस बँक बंद होती. बँकेचे व्यवहार बंद होते. बँक व्यवस्थापकांनी एटीएमची किल्ली सोबत नेल्याने व ते बँकेत न आल्याने ग्राहकांची तारांबड उडाली. त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. कुणाला दवाखाना तर कुणाला लग्नासाठी पैसे काढायचे होते. रकमेअभावी बँका कोरडया जिवती : जिवती ठिकाण हे तालुक्याचे असून येथे एकही राष्ट्रीयकृत बँका नाहीत. कोकण-वैनगंगा ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोनच बँका असून याही बँकात पैसे राहत नसल्याने तालुक्यातील जनतेला हैराण व्हावे लागत आहे. रक्कमेअभावी येथील बँकाच कोरड्या आहेत म्हणण्याची पाळी आली आहे. अनेक वर्षापासून जिवती येथे स्टेट बँकेची मागणी रेटून असली तरी या मागणीकडे संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधीचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना नेहमीच हात हलवित परत जावे लागते. सर्व तालुक्याचे व्यवहार या बँकेत जास्तच असून रक्कम मात्र पुरेशी राहात नाही. एखाद्या ग्राहकाने बँकेतील कर्मचाऱ्यांना पैशा बाबतीत विचारणा केली तर अर्वाच्च भाषेत उत्तर दिले जाते. अनेकदा तर बँकेत पैसे असले तर सामान्य नागरिकांना बँकेत पैसे नसल्याचे सांगत तेच पैसे सावकार लोकांना चुपचाप देत असल्याचेही बोंब आहे.