शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 12, 2017 02:10 IST

चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत.

नागरिक हैराण : ग्रामीण भागात बिकट परिस्थिती चंद्रपूर : चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. त्रासलेले नागरिक बुधवारी बुद्धजयंतीची सुटी असल्याने कोणाकडे तक्रारही नोंदवू शकत नव्हते. चंद्रपूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांमध्ये आणखीही बिकट परिस्तिथी आहे. चंद्रपुरात स्टेट बँक आॅफ इंडियाचे पाच एटीएम आहेत. बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदीचेही एटीएम कार्यरत आहेत. तसेच जवळच्या पडोली येथेही एक एटीएम आहे. परंतु बुधवार या सुटीच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या एटीएमवर फिरूनही रोख रक्कम मिळाली नाही. नागरिकांना एसबीआयच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्येच तेवढी रक्कम मिळाली. या एटीएमवर रक्कम मिळत असल्याने तेथे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत तेथे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नोटबंदी लागू झाल्यापासून चंद्रपूर शहरात रोख रकमेचा तुटवडा सुरू झाला आहे. मधल्या दोन महिन्यात व्यवहार सुरळीत झाले, असे वाटत असताना पुन्हा गेल्या आठवड््यापासून एटीएम केंद्र ‘आऊट आॅफ कॅश’ दाखविले जात आहेत. बँक आॅफ इंडियाचे एटीएम कायम ‘आऊट आॅफ कॅश’ अशी पाटी काचेच्या प्रवेशद्वारावर मिरवित असते. त्याबाबत बँकेचे अधिकारीही व्यवस्थित उत्तर देत नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. पाटण येथे बँकेत मनमानी पाटण : जिवती तालुक्यात एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा पाटण येथे आहे पूर्ण तालुक्याचा व्यवहार याच बँकेतून चालतो. तीन ते चार दिवस बँक बंद होती. बँकेचे व्यवहार बंद होते. बँक व्यवस्थापकांनी एटीएमची किल्ली सोबत नेल्याने व ते बँकेत न आल्याने ग्राहकांची तारांबड उडाली. त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. कुणाला दवाखाना तर कुणाला लग्नासाठी पैसे काढायचे होते. रकमेअभावी बँका कोरडया जिवती : जिवती ठिकाण हे तालुक्याचे असून येथे एकही राष्ट्रीयकृत बँका नाहीत. कोकण-वैनगंगा ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोनच बँका असून याही बँकात पैसे राहत नसल्याने तालुक्यातील जनतेला हैराण व्हावे लागत आहे. रक्कमेअभावी येथील बँकाच कोरड्या आहेत म्हणण्याची पाळी आली आहे. अनेक वर्षापासून जिवती येथे स्टेट बँकेची मागणी रेटून असली तरी या मागणीकडे संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधीचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना नेहमीच हात हलवित परत जावे लागते. सर्व तालुक्याचे व्यवहार या बँकेत जास्तच असून रक्कम मात्र पुरेशी राहात नाही. एखाद्या ग्राहकाने बँकेतील कर्मचाऱ्यांना पैशा बाबतीत विचारणा केली तर अर्वाच्च भाषेत उत्तर दिले जाते. अनेकदा तर बँकेत पैसे असले तर सामान्य नागरिकांना बँकेत पैसे नसल्याचे सांगत तेच पैसे सावकार लोकांना चुपचाप देत असल्याचेही बोंब आहे.