शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील भ्रष्टाचार अडकला चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिकमारा येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंंट क्राँक्रीट ...

गेवरा : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिकमारा येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंंट क्राँक्रीट बंंधाऱ्याच्या बांधकामात ग्रामपंचायतीचे तत्कालिन सचिव व सरपंचांनी बनावट बिलांच्या आधारे लाखो रुपयांची परस्पर उचल करून विल्हेवाट लावली. यात चार लाख ७५ हजार ९६२ रुपये इतक्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले. मात्र दोषींंवर फौजदारी व दंडात्मक कारवाई न झाल्याने सदर प्रकरण चौकशीच्याच फेऱ्यात अडकून असल्याने स्थानिक नागरिक व तक्रारकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.सन २०१२-१३ च्या वित्तीय वर्षात चिकमारा ग्रामपंचायती अंतर्गत बंधारा बांधकाम मंजूर झाले. त्याची अंदाजपत्रकीय किंमत पाच लाख ६७ हजार ६७५ रुपये इतकी होतीे. तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच व अन्य काही सदस्यांच्या संगनमताने सदर बंधारा बांधकामात गैरप्रकार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सिंदेवाही गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन २१ फेब्रुवारीला स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल सादर केला. कागदोपत्री बंधाऱ्याचे बांधकाम ग्रामपंचायतीने केले असले तरी प्रत्यक्षात सदर काम ठेकेदारांकडून केल्याचे स्पष्ट होते. परंतु सरपंच व सचिवांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून ४ लाख ७५ हजार ९६२ ची अफरातफर केल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंचांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) खाली दोषी ठरविण्यात आले. तसेच सचिव जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपिल १९६४ चे नियम ४(३ व ५) नुसार कारवाईस पात्र असल्याचा खुलासा पंचायत विभागाने केला असतानाही दोषींवर कोणत्याच प्रकारची कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायतीत झालेल्या या गैरव्यवहारात सरपंच व उपसरपंच जबाबदार ठरत असतील तर होणाऱ्या कारवाईसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रकनुसार दोषींवर आर्थिक गुन्ह्यासंबंधी फौजदारी कारवाई तात्काळ करण्याबाबत अहवालात शिफारस करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाईची जबाबदारी टाकल्याने कारवाईसााठी विलंब होत असल्याचा आरोप आहे. या प्रक्रीयेत कायदा व नियम धाब्यावर बसविला असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर सरपंच, उपसरपंच, सचिव आणि इतर कर्मचाऱ्यांकडून मुदत संपल्यानंतर केवळ रक्कम वसुली केली जाते. परंतु त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जात नसल्याने शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)