शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 30, 2016 01:00 IST

केंद्र शासनाने ग्राम उदय ते भारत उदय हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. यामाध्यमातून ग्रामपंचायतींना बळकटी येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार: स्वच्छता उत्सवात २९९ ग्रामपंचायती पुरस्कृतचंद्रपूर : केंद्र शासनाने ग्राम उदय ते भारत उदय हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. यामाध्यमातून ग्रामपंचायतींना बळकटी येणार आहे. गावाचे सशक्तीकरण होणार आहे. सरपंचांनी सेवावृत्तीचे धोरण स्वीकारून गावाचा विकास करावा. त्यातून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत उभा करण्यास सहकार्य करावे. देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजनव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्यावतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित हागणदारीमुक्त उत्सव, सत्कार समारंभ, शिक्षण विभागाअंतर्गत मिशन नवचेतना कार्यक्रम, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार आणि जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींना पुरस्कार करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, शिक्षण समितीचे सभापती देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, चंद्रपूर पंचायत समितीचे बंडू माकोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र मोहिते, प्रदीप सिरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात हागणदारीमुक्त तालुका करून बल्लारपूर पंचायत समितीने विदर्भात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल संवर्ग विकास अधिकारी बी.बी.गजबे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे तर ब्रह्मपुरी पंचायत समितीने पंचायत राज सशक्तीकरण अभियानात केंद्राचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सभापती नेताजी मेश्राम यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवचेतना उपक्रमात सहभागी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.प्रास्ताविक मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी तर संचालन कल्पना बन्सोड यांनी केले. आभार रविंद्र मोहिते यांनी मानले. (प्रतिनिधी)