शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: April 30, 2016 01:00 IST

केंद्र शासनाने ग्राम उदय ते भारत उदय हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. यामाध्यमातून ग्रामपंचायतींना बळकटी येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार: स्वच्छता उत्सवात २९९ ग्रामपंचायती पुरस्कृतचंद्रपूर : केंद्र शासनाने ग्राम उदय ते भारत उदय हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. यामाध्यमातून ग्रामपंचायतींना बळकटी येणार आहे. गावाचे सशक्तीकरण होणार आहे. सरपंचांनी सेवावृत्तीचे धोरण स्वीकारून गावाचा विकास करावा. त्यातून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत उभा करण्यास सहकार्य करावे. देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजनव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्यावतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित हागणदारीमुक्त उत्सव, सत्कार समारंभ, शिक्षण विभागाअंतर्गत मिशन नवचेतना कार्यक्रम, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार आणि जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींना पुरस्कार करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, शिक्षण समितीचे सभापती देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, चंद्रपूर पंचायत समितीचे बंडू माकोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र मोहिते, प्रदीप सिरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात हागणदारीमुक्त तालुका करून बल्लारपूर पंचायत समितीने विदर्भात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल संवर्ग विकास अधिकारी बी.बी.गजबे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे तर ब्रह्मपुरी पंचायत समितीने पंचायत राज सशक्तीकरण अभियानात केंद्राचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सभापती नेताजी मेश्राम यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवचेतना उपक्रमात सहभागी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.प्रास्ताविक मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी तर संचालन कल्पना बन्सोड यांनी केले. आभार रविंद्र मोहिते यांनी मानले. (प्रतिनिधी)