शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते रुंदावणार, जलवाहिन्या बदलणार

By admin | Updated: August 20, 2014 23:25 IST

चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.

भाजीपाला विक्री केंद्र : मनपाच्या आमसभेत मंजुरीचंद्रपूर : चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.महानगरपालिकेची आमसभा आज मनपाच्या सातमजली इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अजेंड्यात ठेवण्यात आलेल्या सर्व विषयांना कोणताही वादविवाद न होता मंजुरी मिळाली, हे विशेष. चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र ३० वर्षांपूर्वीचे रस्ते आजही तसेच कायम आहे. त्यामुळे शहरात नेहमीच वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजताना दिसतात. शहर विकास आराखड्यानुसार एकाही रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेला आजवर करता आले नाही. त्यामुळे आता या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमसभेत जोरदार चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून व गरज आहे तिथे भूसंपादन करून रस्ते रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. याशिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचाही प्रश्न बिकट आहे. जुन्या जलवाहिन्या आता खिळखिळ्या झाल्या आहे. या जलवाहिन्या बदलवून नवीन जलवाहिन्या टाकण्यालाही आमसभेत सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होऊ शकणार आहे.१० वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका मालमत्ता कर आकारणी करीत आहे. मागील १० वर्षांत अनेक नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारतींचे व्यावसायिकीकरण झाले आहे. यात महापालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील प्रापर्टीचे नव्याने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. वेकोलिच्या दुर्गापूर, भटळी कोळसा खाणीतील ब्लॉस्टिंगमुळे तूकूम परिसरात जलशुध्दीकरणाची पाईप लाईन वेळोवेळी फुटते. त्यामुळे आता वेकोलिच्या खनिज विकास निधीतून या पाईपलाईनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या आमसभेत घेण्यात आला.शेतकऱ्यांसाठी यंदा प्रथमच महापालिकेने सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला, कडधान्यांची लागवड करतात. त्यांना आपला शेतमाल दलालाशिवाय थेट विकता यावा, यासाठी भाजीपाला विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक झोनमध्ये हे केंद्र असणार आहे. तिथे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. याला आमसभेने मंजुरी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)