शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते

By admin | Updated: February 1, 2016 00:52 IST

नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत.

जल परिषदेला प्रारंभ : राजेंद्र सिंग यांचे जनतेला आवाहनचंद्रपूर : नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत. त्यांना न्यायालय नव्हे तर, सरकार आणि समाजमनच वाचवू शकते, त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग यांनी केले. चंद्रपुरात रविवारपासून दोन दिवसीय जलपरिषद आणि कृषी प्रदर्शनीला स्थानिक क्लब ग्राऊंडवर प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर होते. आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार नाना श्यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अ‍ॅड. रविंद्र भागवत, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्याकारी अधिकारी कल्याणकर, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ. राजेंद्रसिंग म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही योजना भ्रष्टाचाराकडून सदाचाराकडे नेणारी योजना आहे. यासारख्या योजना प्रभावीपणे राबविल्यास दुष्काळावर मात करुन शेतीला सिंचनासाठी मदत होणार आहे. चंद्रपूरचे प्रदुषणाचे वातावरण बदलविण्यासाठी जंगल, जमीन आणि पाणी याकडे विशेष लक्ष दयावे लागणार आहे. जंगलातून वाहणा-या नदयांचा प्रवाह मंद करुन तो अडवूण भूगर्भात साठविला पाहिजे. त्यामुळे भूगभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.महाराष्ट्र शासनाने लोकसहभागातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार काढून राजेंद्रसिंह म्हणाले, भविष्यातील पाणी टंचाई व सिंचन वाढीवर नियोजनात्मक केलेले प्रयत्न म्हणजेच जलयुक्त शिवार योजना आहे. इरई नदीचे योग्य नियोजन केल्यास चंद्रपरातील पुराची स्थिती आणि पाण्याची टंचाई या समस्या आपोआप दूर होती, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोपटराव पवार म्हणाले, शेती, पाणी आणि जोडधंदे एकत्र आल्यास शेतीचे चित्र बदललेले असेल. विदर्भात पाणी असतांना सुध्दा शेतकरी आत्महत्या करीत आहे, हे थांबले पाहिजे. शेतकरी खरीपाकडून रब्बीकडे जात आहे. रब्बीसाठी संरक्षीत पाणी देणे गरजेचे आहे. यंत्रणांच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगून पवार म्हणाले, गावातून काम करणारी यंत्रणा बाजूला झाली की कामाची गती मंदावते. जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्राने देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्त मधून केवळ बंधारेच नाही तर इतर जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करावी. आता १४ व्या आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्यामुळे पाच वर्षांचा आराखडा गावाने तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. रविंद्र भागवत यांनी स्वयंपूर्ण शेतकरी निर्माण करण्यासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता त्यांनी विशद केली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. कार्यक्रमाला अनेक गावातील सरपंच, शेतकरी, बचतगटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)