शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

माणूस उठला पर्यावरणाच्या जीवावर !

By admin | Updated: June 5, 2016 00:39 IST

पर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे.

जंगलतोडीने बिघडला पर्यावरणाचा समतोल : पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरजप्रकाश काळे गोवरीपर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे. दिवसागणिक चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणारे उद्योगधंदे, कारखाने हे जरी जिल्हावासीयांसाठी फायद्याचे ठरत असले तरी कारखान्यातून सोडण्यात येणारे विषारी वायू हे पर्यावरणासाठी घातक आहे. एकीकडे माणसाने पर्यावरणावरच घाव घातला तर दुसरीकडे पर्यावरण दूषित झाल्याने माणसाचा श्वास कोंडला जातो. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण देशपातळीवर चर्चिले जात असतानाही आजवर यावर संबंधित विभागाने नियंत्रण मिळविलेले नाही.पर्यावरण हा तर सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. माणसाच्या जन्मापासून तर त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माणूस पर्यावरणाच्या छायेत आयुष्य जगत असतो. निसर्गाचा समतोल आज बिघडला आहे. माणसाने स्वत:च्या फायद्यासाठी जंगलावरच कुऱ्हाड चालविली. त्यामुळे वनसंपदा नष्ट झाली. आज जिल्ह्यात उद्योगधंद्याची भरमार आहे. माणसाच्या प्रगतीत उद्योगधंद्याचे योगदान महत्त्वाचे आहे, हे खरे. मात्र कारखान्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याने पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. कोणताही कारखाना सुरू करताना पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी शासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन करून पर्यावरणाला बाधा पोहचू नये यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु शासनाने कारखाण्यांना घालून दिलेले नियम कारखानदारांनी धाब्यावर बसविले आहे. त्यामुळे कारखाने मोठ्या प्रमाणात धूर ओकायला लागले आहे. धूळ प्रदूषण वाढल्याने माणसाचा श्वास दिवसेंदिवस गुदमरत चालला आहे. यासाठी काही सामाजिक संघटना पर्यावरण वाचवा संदेश देत पुढे आल्या आहे.पर्यावरणाच्या ऱ्हासाला खरे तर माणूसच जबाबदार आहे. माणसाने पर्यावरणाचा समतोल बिघडविल्याने निसर्ग आता लहरीपणाने वागायला लागला आहे. पर्यावरण संवर्धन करणे आज काळाची गरज असताना माणूस असा बेफीकीरीने वागायला लागला आहे की त्याने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात सिमेंट उद्योग, पेपरमील, वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, स्टिल प्लँट यासारखे अनेक उद्योग आहेत. उद्योगांनी नदी, नाल्याचे अस्तीत्वच धोक्यात आणले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. माणसाने पर्यावरणावरच घाव घातल्याने माणसावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. हा सारा निसर्गाचा कोप नव्हे, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने पर्यावरणात बदल होऊन उद्भवलेली कृत्रीम परिस्थिती आहे. पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला तर एक दिवस माणसाचे अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हा भविष्याचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी पर्यावरण वाचवा चा संदेश देऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे आज काळाची गरज झाले आहे.शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जाझाडांची संख्या कमी झाल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. हा एकच धागा पकडून शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आदेश दिले. यावर शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाच्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता कागदावरच वृक्ष फुलविले. यात शासनाचा शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा उडविण्यात आला.पर्यावरण वाचवासाठी सामाजिक संघटना सरसावल्यापर्यावरण वाचविणे आज काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून त्या नेटाने काम करीत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी चाललेली त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. पर्यावरणाला वाचविणे हे सर्वाचे परमकर्तव्य आहे.