शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

महाकालीचे दर्शन घेऊन भक्त निघाले परतीच्या प्रवासाला

By admin | Updated: April 5, 2015 01:35 IST

जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविक चंद्रपुरात दाखल झाले.

चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविक चंद्रपुरात दाखल झाले. २५ मार्चपासून भाविकांचा जत्था चंद्रपुरात येत आहे. आज शनिवारी चैत्र शुध्द पोर्णिमा असली तरी चंद्रग्रहण होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांनी शुक्रवारीच माता महाकालीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चणा केली. शनिवारी मंदिर व्यवस्थाने चंद्रग्रहण असल्याने मुखदर्शनाची व्यवस्था केली होती. भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन रात्रीच परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला.जिल्ह्याचे आराध्यदैवत देवी महाकाली आहे. एप्रिल महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा येथे भरते. यात्रा कालावधीत देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर आणि आंध्रप्रदेशातील भाविष मोठ्या संख्येने येतात. येथील ऐतिहासिक जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट येथे नारळ फोडून देवी महाकालीच्या नामाचा गरज करीत भाविक मंदिराकडे रवाना होताना दिसले. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चालली होती. शुक्रवारी ही गर्दी आणखी वाढली होती. त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागत होता. शहरातील सेवाभावी संस्थांनी पाणी, जेवण, प्रसादाची व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोतराजांचे आगमन झाले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. झरपट नदीवर अंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. काल हजारो भाविकांनी पवित्र स्नान घेतले.महाकाली यात्रेत चैत्र पोर्णिमा दिवस मुख्य असतो. या दिवशी दर्शन घेता यावे, यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक शहरात दाखल होत असतात. पोर्णिमेच्या दिवशी लाखांवर भाविक रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतात. भाविकांना दर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने मंदिराचे दार २४ तास उघडे असते. देवीच्या मूर्तीला स्पर्श करून भाविक स्वत:ला धन्य मानतात. यावर्षी शनिवार हा मुख्य दिवस होता. मात्र आज चंद्रग्रहण होते. त्यामुळे महाकाली मातेचे भाविकांना प्रत्यक्ष स्पर्शदर्शन मिळाले नाही. बहुतांश भाविकांना आज गाभाऱ्यातून केवळ मुखदर्शनच घेता आले. तशी व्यवस्था केली होती. (शहर प्रतिनिधी)