शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

दाव्या-प्रतिदाव्यात रंगला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

मूल : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात लढत असली तरी ...

मूल : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात लढत असली तरी तिसरी आघाडी व इतर पक्षांच्या उमेदवारांनी या दोन्ही पक्षाला काही प्रमाणात रोखण्यास यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपने २२ तर काँग्रेसने २४ ग्रामपंचायतींवर दावा केला. राजकीय वर्चस्वासाठी दावे- प्रतिदावे अजूनही सुरूच आहेत.

आघाडी असलेल्या ग्रामपंचायतीवर आपले समर्थन असल्याची कबुली यावेळी प्रसारमाध्यमाला दिली. यात पहिल्यांदाच शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व युवा परिवर्तन आघाडीने घेतलेला विजयदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी काँग्रेसची पकड या तालुक्यात होती. मात्र, मतभेदांचा फायदा घेत माजी आमदार शोभा फडणवीस यानी आपला दबाव निर्माण केला. ३० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. या तालुक्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांबाबत नाव चर्चिले जाते. गावची निवडणूक म्हटली की त्यात पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्याचाच प्रत्यय ग्रामपंचतीच्या निकालावरून आला. गावागावात आपसी मतभेदांमुळे एकाच पक्षाचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे ठाकल्याने मते विखुरली गेली. त्याचा परिणाम पराभव होण्यास झाला असल्याचे दिसून आले. यात भाजपा असो की काँग्रेस या परीक्षेतून पक्षाला जावे लागल्याचे दिसून येते. आपसातील मतभेदाचा फायदा या निवडणुकीत ८ गावात युवा परिवर्तन आघाडी, शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे दिसून आले. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या पक्षाला जनतेने नाकारत सत्तापरिवर्तन घडवून आणले. भाजपा २२ तर काँग्रेस २४ ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या पक्षाकडे राखीव गटाचा उमेदवार नसल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी भाजपा व काँग्रेसने केलेले दावे सत्यात उतरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.