शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST

व्यावसायिकांवर कारवाई करावी चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. लाॅकडाऊनपूर्वी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या बाजारातून हद्दपार ...

व्यावसायिकांवर कारवाई करावी

चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. लाॅकडाऊनपूर्वी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या बाजारातून हद्दपार झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा बहुतांश व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्या दिसत असून, ते खुलेआम ग्राहकांना देत आहे. त्यामुळे संबंधित पथकांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

--

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री, आरोग्य धोक्यात

घुग्घुस : शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात अन्न निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना तारांबळ उडत असते. याकडे लक्ष द्यावे

शासकीय निवासस्थाने झाली दुर्लक्षित

चंद्रपूर : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निवासस्थाने दुर्लक्षित आहेत. प्रामुख्याने आरोग्य सेवेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ही सोय करून दिली आहे. त्याचा मात्र वापरच केला जात नाही. ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत.

बसमध्ये प्रथमोपचार साहित्य उलपब्ध करा

चंद्रपूर : प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, असे परिवहन विभागाचे सर्व आगारांना निर्देश आहे. मात्र ग्रामीण भागात धावणाऱ्या बसमध्ये प्रथमोपचार पेटीच दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशाची बस आगारांकडून अवहेलना होत आहे. एखाद्या वेळी अपघात घडल्यास जखमीवर उपचार करण्यास अडचण येऊ शकते. याकडे आगार प्रशासनाने लक्ष देऊन आपात्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजनांची मागणी आहे.

जिवती तालुक्यातील समस्या सोडवा

जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात अनेक समस्या आजही सुटल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधादेखील येथे पुरेशा प्रमाणात पोहोचल्या नाहीत. सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली. मात्र पाहिजे त्याप्रमाणात या तालुक्याचा विकास झाला नाही.

नोकरभरती नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न

गोंडपिपरी : कोरोना संकटामुळे अजूनही नोकरभरती पाहिजे तशी होत नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. अनेकांनी पैसे खर्च करुन स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. मात्र शासनाकडून नोकरभरतीबाबत जागा निघणे बंद झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत आहे.

पुरस्कारप्राप्त गावातच स्वच्छतेचे तीनतेरा

सिंदेवाही : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, यासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. गावात शौचालयाची संख्या वाढली. परंतु, या शौचालयाचा वापर नगण्य आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे.