शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प

By admin | Updated: April 16, 2016 00:38 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे.

राज्यातील पहिला लोगो : संध्या गुरुनुले यांच्या हस्ते प्रकाशन मूल : केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असलेला मूल तालुका हागणदारी मुक्त व्हावा यासाठी पंचायत समिती मूलच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लोगो तयार करुन हागणदारी मुक्त चळवळीला गती देण्याचे कार्य केल्याने मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. मूल पंचायत समिती कार्यालयात आयोजित लोगो प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती मूलच्या वतीने ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती निमित्त भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगंत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीबांचे जीवनमान उंचावणे आदी कार्यक्रम येत्या १० दिवस गावागावात घेण्यात येणार आहेत.पंचायत समिती मूल येथे आयोजित ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानांची कार्यशाळा जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, कृषी अधिकारी विवेक दुधे, जि.प. पंचायत विभागाचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, विस्तार अधिकारी जे.के. राऊत, राजू परसावार आदी उपस्थित होते. मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र लोगोची निर्मिती करुन तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)