शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

मूल तालुका हागणदारी मुक्तीचा संकल्प

By admin | Updated: April 16, 2016 00:38 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे.

राज्यातील पहिला लोगो : संध्या गुरुनुले यांच्या हस्ते प्रकाशन मूल : केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प चालविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष लक्ष असलेला मूल तालुका हागणदारी मुक्त व्हावा यासाठी पंचायत समिती मूलच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र लोगो तयार करुन हागणदारी मुक्त चळवळीला गती देण्याचे कार्य केल्याने मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी व्यक्त केले. मूल पंचायत समिती कार्यालयात आयोजित लोगो प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती मूलच्या वतीने ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियान १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती निमित्त भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगंत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीबांचे जीवनमान उंचावणे आदी कार्यक्रम येत्या १० दिवस गावागावात घेण्यात येणार आहेत.पंचायत समिती मूल येथे आयोजित ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानांची कार्यशाळा जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, कृषी अधिकारी विवेक दुधे, जि.प. पंचायत विभागाचे समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, विस्तार अधिकारी जे.के. राऊत, राजू परसावार आदी उपस्थित होते. मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीमधील शौचालयाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र लोगोची निर्मिती करुन तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)