शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा ठराव

By admin | Updated: May 1, 2016 00:32 IST

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळा प्रकरणी शनिवारी चौकशी समिती अहवालाचा आधार घेत ...

बैलबंडी घोटाळा : रणदिवेंच्या सेवासमाप्तीची शिफारस करणार चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळा प्रकरणी शनिवारी चौकशी समिती अहवालाचा आधार घेत जिल्हा परिषद सभागृहाने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे तसेच निलंबन करण्याचा ठराव पारित केला. विशेष घटक योजनेचे काम सांभाळणारे रणदिवे यांच्यावरही समितीने ठपका ठेवला. त्यांच्या सेवा समाप्तीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सध्या गुरनुले यांनी दिली. कमी वजनाच्या बैलबंडीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच गाजत आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाने बैलबंड्या खरेदी केल्या. कृषी विभागाने एक हजार ४७१ तर समाजकल्याण विभागाने ३०९ बैलबंड्या लाभार्थ्यांना पुरविल्या. एमएआयडीसीने हे काम पुरवठादारांना दिले होते. पुरवठादाराने १५ पंचायत समित्यांत बैलबंड्या पुरविल्या. मात्र त्या कमी वजनाच्या आढळून आल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्याकडे केल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनीही बैलबंड्या तपासल्या. त्यात त्या कमी वजनाच्या दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. सभागृहानेही प्रकरण गांभीर्याने घेतले. बैलबंडी प्रकरणाची चौकशी लागली. उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित झाली. अविनाश जाधव, संदीप गड्डमवार, अमर बोडलावार, शांताराम चौखे यांच्यासह काही अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने पंचायत समित्यांत जाऊन बैलबंड्यांची तपासणी केली. तपासणीत बैलबंड्या कमी वजनाच्या आढळून आला. तसा अहवाल समितीने अध्यक्षांकडे सादर केला. अध्यक्षांनी बैलबंडीवर विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि. ३०) दुपारी विशेष सभा पार पडली. सुरूवातीला अहवाल सभागृहात वाचून दाखविण्यात आला. त्यात सर्व घोटाळा समोर आला. संपूर्ण खरेदी व्यवहार अचूकपणे पार पडण्याची जबाबदारी विभाग प्रमुख, कृषी विकास अधिकारी, योजना प्रमुख, जिल्हा कृषी अधिकारी यांची होती. मात्र, त्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. त्यामुळे बैलबंडी पुरविण्याचे काम जबाबदार संस्था एमएआयडीसीला देण्यात आले. मात्र, त्यांनीही निकृष्ट, कमी वजनाच्या बैलबंड्या जिल्हा परिषदेला पुरविल्या. १,४७१ बैलबंड्या कमी वजनाच्या व मापदंडानुसार न दिल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान झाल्याचेही मत समितीने नोंदविले आहे. या साऱ्या प्रकरणात कृषी विभाग दोषी आहे. त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष कल्पना बोरकर, देवराव भोंगळे, जाधव, गड्डमवार, कांबळे, चौखे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)