शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा ठराव

By admin | Updated: May 1, 2016 00:32 IST

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळा प्रकरणी शनिवारी चौकशी समिती अहवालाचा आधार घेत ...

बैलबंडी घोटाळा : रणदिवेंच्या सेवासमाप्तीची शिफारस करणार चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बैलबंडी घोटाळा प्रकरणी शनिवारी चौकशी समिती अहवालाचा आधार घेत जिल्हा परिषद सभागृहाने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे तसेच निलंबन करण्याचा ठराव पारित केला. विशेष घटक योजनेचे काम सांभाळणारे रणदिवे यांच्यावरही समितीने ठपका ठेवला. त्यांच्या सेवा समाप्तीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सध्या गुरनुले यांनी दिली. कमी वजनाच्या बैलबंडीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच गाजत आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाने बैलबंड्या खरेदी केल्या. कृषी विभागाने एक हजार ४७१ तर समाजकल्याण विभागाने ३०९ बैलबंड्या लाभार्थ्यांना पुरविल्या. एमएआयडीसीने हे काम पुरवठादारांना दिले होते. पुरवठादाराने १५ पंचायत समित्यांत बैलबंड्या पुरविल्या. मात्र त्या कमी वजनाच्या आढळून आल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांच्याकडे केल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनीही बैलबंड्या तपासल्या. त्यात त्या कमी वजनाच्या दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. सभागृहानेही प्रकरण गांभीर्याने घेतले. बैलबंडी प्रकरणाची चौकशी लागली. उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित झाली. अविनाश जाधव, संदीप गड्डमवार, अमर बोडलावार, शांताराम चौखे यांच्यासह काही अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने पंचायत समित्यांत जाऊन बैलबंड्यांची तपासणी केली. तपासणीत बैलबंड्या कमी वजनाच्या आढळून आला. तसा अहवाल समितीने अध्यक्षांकडे सादर केला. अध्यक्षांनी बैलबंडीवर विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि. ३०) दुपारी विशेष सभा पार पडली. सुरूवातीला अहवाल सभागृहात वाचून दाखविण्यात आला. त्यात सर्व घोटाळा समोर आला. संपूर्ण खरेदी व्यवहार अचूकपणे पार पडण्याची जबाबदारी विभाग प्रमुख, कृषी विकास अधिकारी, योजना प्रमुख, जिल्हा कृषी अधिकारी यांची होती. मात्र, त्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. त्यामुळे बैलबंडी पुरविण्याचे काम जबाबदार संस्था एमएआयडीसीला देण्यात आले. मात्र, त्यांनीही निकृष्ट, कमी वजनाच्या बैलबंड्या जिल्हा परिषदेला पुरविल्या. १,४७१ बैलबंड्या कमी वजनाच्या व मापदंडानुसार न दिल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान झाल्याचेही मत समितीने नोंदविले आहे. या साऱ्या प्रकरणात कृषी विभाग दोषी आहे. त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष कल्पना बोरकर, देवराव भोंगळे, जाधव, गड्डमवार, कांबळे, चौखे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)