शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

नव्या विभागात स्थलांतरणास विरोध

By admin | Updated: June 24, 2017 00:40 IST

शासनाने अलीकडेच मृद व जलसंधारण विभाग स्पापन केला. तसा आदेश मे महिन्यात निर्गमित करण्यात आला.

आधी आकृतीबंध तयार करा : कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे स्थलांतरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने अलीकडेच मृद व जलसंधारण विभाग स्पापन केला. तसा आदेश मे महिन्यात निर्गमित करण्यात आला. या नव्या विभागात राज्य शासनाच्या कृषी विभागातील जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. आधी आकृतिबंध तयार करा, नंतरच वर्ग करा, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी स्वीकारली असल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे.मृद व जलसंधारण हा विभाग आधी कृषी विभागाच होता. मृद, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा विभागच वेगळा करण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण हा स्वतंत्र विभाग आता तयार करण्यात आला. ३१ मे २०१७ रोजी शासनाने तसा अध्यादेश निर्गमित केला. या अध्यादेशानंतर नव्या विभागात राज्य शासनाच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा भरणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मृद, जलसंधारण विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकांची सर्वच पदे आपल्याकडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकास पदोन्नतीला पद राहणार नाही. मुळातच कृषी विभागात बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यातच ही पदे मृद व जलसंधारणात वर्ग केल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल, याबाबत या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आधी सुधारित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने केली आहे. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नवा आकृतीबंध तयार करताना संघटनेला विचारात घ्यावे. सुधारित आकृतीबंधात कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी असे करावे. कृषी सहायकामधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी. या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. पदोन्नती करताना परीक्षेची अट घालण्यात आली असून ही अट वगळण्याची मागणीही संघटनेची आहे.बदल्यांचे प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबितराज्य शासनाच्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मागील दोन वर्षापासून मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यावर अजूनही शासनाने निर्णय घेतला नसल्याने कृषी सहायकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.