शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

आरक्षणामुळे उजाडलेले प्रेमनगर पुन्हा वसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:28 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली.

ठळक मुद्दे१६ कुटुंबांचा संघर्ष : उदरनिर्वाहाच्या साधनासाठी ग्रामस्थ पुन्हा आपल्याच गावात

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेमनगर येथील नागरिक सात महिन्यांपूर्वी सेवादासनगर येथे रहायला आले. मात्र येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा स्थलांतरित झालेले सर्व कुटुंब प्रेमनरात वास्तव्याला गेले आहेत.महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर गेल्या दहा वर्षांपूर्वी शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगरवरून स्थालंतरित होऊन काही कुटुंबांनी तेलंगणातील कोलामा गावाजवळच्या शेतातच नवीन वस्ती थाटली होती. या वस्तीतील नागरिकांची नावे दोन्ही राज्यातील मतदार यादीतही नोंदविण्यात आली होती. दोन्ही राज्यातून आपला विकास होणार, अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र अचानक वर्षभरापूर्वी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणाचा वाद पेटला. आता प्रेमनगरातील ग्रामस्थही आपल्या आरक्षणाचा फायदा घेईल, असा समज झाल्याने कोलामा येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी चक्क प्रेमनगर गावावर हल्ला चढवित गाव उठविले होते. गावात वातावरण तापत असताना वणी पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत प्रेमनगरवासीयांचे समुपदेशन केले आणि त्या नागरिकांना सेवादासनगर येथे हलविण्यात आले होते. या घटनेला तब्बल सात महिन्यांचा कालावधी झाला. त्या कालावधीत त्यांच्या प्रेमनगर येथे असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा तर सोडाच जगण्याचा आधार प्रशासनाने दिला नाही. अखेर निराश झालेल्या स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा प्रेमनगरातच जाऊन संसार थांटला आहे.प्रेमनगरात आमची शेती आहे. मात्र सेवादासनगर येथे प्रशासनाने आम्हाला स्थलांतरित केल्याने सेवादासनगर येथे राहून प्रेमनगरातील शेती करणे कठीण होत होते. त्यामुळे आम्ही पुन्हा प्रेमनगरातच वस्ती थाटली आहे.- धनराज आडे,ग्रामस्थ, प्रेमनगर.