शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

आरक्षणामुळे उजाडलेले प्रेमनगर पुन्हा वसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:28 IST

तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली.

ठळक मुद्दे१६ कुटुंबांचा संघर्ष : उदरनिर्वाहाच्या साधनासाठी ग्रामस्थ पुन्हा आपल्याच गावात

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणावरून वाद पेटला होता. त्यावेळी जिवती तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या प्रेमनगर गावातील आदिवासी नागरिकांना या आरक्षणाचा फायदा मिळेल, म्हणून तेलंगणा राज्यातील लोकांनी प्रेमनगर येथील आदिवासी बांधवांना गाव रिकामे करा, असे म्हणत गाव पेटविण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेमनगर येथील नागरिक सात महिन्यांपूर्वी सेवादासनगर येथे रहायला आले. मात्र येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा स्थलांतरित झालेले सर्व कुटुंब प्रेमनरात वास्तव्याला गेले आहेत.महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर गेल्या दहा वर्षांपूर्वी शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगरवरून स्थालंतरित होऊन काही कुटुंबांनी तेलंगणातील कोलामा गावाजवळच्या शेतातच नवीन वस्ती थाटली होती. या वस्तीतील नागरिकांची नावे दोन्ही राज्यातील मतदार यादीतही नोंदविण्यात आली होती. दोन्ही राज्यातून आपला विकास होणार, अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र अचानक वर्षभरापूर्वी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात बंजारा आणि आदिवासी समाजात आरक्षणाचा वाद पेटला. आता प्रेमनगरातील ग्रामस्थही आपल्या आरक्षणाचा फायदा घेईल, असा समज झाल्याने कोलामा येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी चक्क प्रेमनगर गावावर हल्ला चढवित गाव उठविले होते. गावात वातावरण तापत असताना वणी पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत प्रेमनगरवासीयांचे समुपदेशन केले आणि त्या नागरिकांना सेवादासनगर येथे हलविण्यात आले होते. या घटनेला तब्बल सात महिन्यांचा कालावधी झाला. त्या कालावधीत त्यांच्या प्रेमनगर येथे असलेल्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा तर सोडाच जगण्याचा आधार प्रशासनाने दिला नाही. अखेर निराश झालेल्या स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा प्रेमनगरातच जाऊन संसार थांटला आहे.प्रेमनगरात आमची शेती आहे. मात्र सेवादासनगर येथे प्रशासनाने आम्हाला स्थलांतरित केल्याने सेवादासनगर येथे राहून प्रेमनगरातील शेती करणे कठीण होत होते. त्यामुळे आम्ही पुन्हा प्रेमनगरातच वस्ती थाटली आहे.- धनराज आडे,ग्रामस्थ, प्रेमनगर.