चंद्रपूर : चंद्रपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात यावे, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, अशा आशयाचे निवेदन राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांच्या सुपुर्द करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शाहु महाराजांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा दिल्या. अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण तथा शाहु मिलची स्थापना व शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती सारखे लोकोपयोगी उपक्रम केले.छत्रपती शाहु महाराजांचे कार्य लोकांना माहीत होण्यासाठी त्यांचे स्मारक चंद्रपूर शहरामध्ये स्थापित करण्याची तसेच त्यांना भारतरत्न देण्याची मागणी राजर्षी छत्रपती शाहु महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष दलितमित्र डी.के. आरीकर व कार्याध्यक्ष अॅड. भगवान पाटील यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात अॅड. हिराचंद बोरकुटे, अरुण धानोरकर, पांडुरंग गावतुरे, अॅड. नूरजहां, ममता गोजे, मोरेश्वर बडोले, राजेश सोलापन, पुरुषोत्तम चौधरी, अनिल देठे, सुधाकर मोकदम, आनंद पाल, मोरेश्वर बडोले, प्रवीण डाहुले, बाबा कारेकार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बस सुरु करण्याची मागणीचिमूर : चिमूर येथे शाळेत जाण्यासाठी जांभुळघाट व मालेवाडा बसस्थानकावरून विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे चिमूर आगारातून जांभूळघाटसाठी बस सुरू करण्याची मागणी आहे. जांभुळघाट-चिमूर बस सुरु करण्याची मागणी
शाहू महाराजांचे स्मारक स्थापण्यासाठी निवेदन
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST