शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

३० पूर्वी थकीत कर्जाचे पुर्नगठन करावे

By admin | Updated: April 23, 2016 00:53 IST

२०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली

दीपक म्हैसेकर : कर्ज वाटप संदर्भात बैठक चंद्रपूर : २०१५ मध्ये खरीप पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नसेल अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाचे पाच हप्ते पाडून देण्यात यावे. त्यांना पाच वर्षापर्यंत हप्त्याची परतफेड करण्याच्या सूचना देण्यात याव्या. तसेच २०१६ या खरीप हंगामासाठी थकीत कर्जदारांना ३० एप्रिलपूर्वी नव्याने पीक कर्जाचे पुर्नगठन करुन देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. शुक्रवारी पीक कर्ज पुर्नगठन बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व गटसचिव, तालुक्याचे सहाय्यक निबंधक, बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निरीक्षक यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपनिबंधक आर. डी. कौसडीकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरबटकर व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग उपस्थित होते.२०१६ या वर्षाच्या खरीप पीक कर्जाचे पुर्नगठन करताना कोणत्याही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)