शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देजन्मतारखेचा उल्लेख गरजेचा : नुतनीकरणासाठी सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कामात आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र सदर कार्ड अद्यावत असणे गरजेचे असल्याने आधार कार्ड नुतनीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. तर एसटी बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीसाठी अद्यावत आधारकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने ज्येष्ठांना उतारवयात आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.आता बस महामंडळामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तसेच ५० टक्के सवलत मिळणविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सुधारीत धोरणानुसार बोगस वय नमूद करुन प्रवास करणाऱ्यांची ठकबाजी एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डप्रणालीमुळे बंद होणार आहे. त्यासाठी आधारचे अद्ययावतीकरण आवश्यक करण्यात आले आहे. एसटी प्रवास सवलत घेणाºया बहुतांश व्यक्ती या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गटातील असतात. त्याची चेहरेपटी वय सांगत असले तरी आधारच्या अद्यायवतीकरणाची सक्ती करण्यात आल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. बस प्रवास सवलत योजनेत महामंडळाने गेल्या काही महिन्यापासून विविध अटी टाकल्या आहेत. त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी या अटी जाचक ठरत आहे.जन्मतारखेच्या सुधारणेसाठी मुंबईवारीआधार कार्डवरील जन्म वर्ष व दहावीनंतरच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारखेत एक वर्षापेक्षा अधिकचा फरक असल्यास जन्मतारीख दुरुस्ती सेवा केंद्रातून होत नसल्यामुळे सेवा केंद्रधारक मुंबई कार्यालयात जाऊन जन्मतारखेत दुरुस्ती करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करुन मुंबई येथे जावे लागत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यातही यूआयडीआय नेहमीच आपल्या आधार कार्ड संदर्भातील नियमात बदल करीत असल्याने व वेळी-अवेळी जाचक अटीमुळे आधारकार्ड आॅपरेटरसुद्धा हैराण झाले आहेत. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड