शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देजन्मतारखेचा उल्लेख गरजेचा : नुतनीकरणासाठी सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय कामात आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र सदर कार्ड अद्यावत असणे गरजेचे असल्याने आधार कार्ड नुतनीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. तर एसटी बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीसाठी अद्यावत आधारकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने ज्येष्ठांना उतारवयात आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.आता बस महामंडळामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तसेच ५० टक्के सवलत मिळणविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सुधारीत धोरणानुसार बोगस वय नमूद करुन प्रवास करणाऱ्यांची ठकबाजी एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डप्रणालीमुळे बंद होणार आहे. त्यासाठी आधारचे अद्ययावतीकरण आवश्यक करण्यात आले आहे. एसटी प्रवास सवलत घेणाºया बहुतांश व्यक्ती या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गटातील असतात. त्याची चेहरेपटी वय सांगत असले तरी आधारच्या अद्यायवतीकरणाची सक्ती करण्यात आल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. बस प्रवास सवलत योजनेत महामंडळाने गेल्या काही महिन्यापासून विविध अटी टाकल्या आहेत. त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी या अटी जाचक ठरत आहे.जन्मतारखेच्या सुधारणेसाठी मुंबईवारीआधार कार्डवरील जन्म वर्ष व दहावीनंतरच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारखेत एक वर्षापेक्षा अधिकचा फरक असल्यास जन्मतारीख दुरुस्ती सेवा केंद्रातून होत नसल्यामुळे सेवा केंद्रधारक मुंबई कार्यालयात जाऊन जन्मतारखेत दुरुस्ती करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करुन मुंबई येथे जावे लागत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यातही यूआयडीआय नेहमीच आपल्या आधार कार्ड संदर्भातील नियमात बदल करीत असल्याने व वेळी-अवेळी जाचक अटीमुळे आधारकार्ड आॅपरेटरसुद्धा हैराण झाले आहेत. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड