शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बाळशास्त्री जांभेकरांच्या सिद्धांताची आठवण ठेवावी

By admin | Updated: January 9, 2016 01:19 IST

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते.

कीर्तिवर्धन दीक्षित यांचे प्रतिपादन : बल्लारपूर प्रेस असोसिएशनतर्फे पेपर एजंटचा सत्कारबल्लारपूर : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. चांगले-वाईट जे काही घडते ते तो आपल्या लेखणीने समाजापुढे मांडतो. त्यामुळे त्याला चौफेर दृष्टी ठेवून तसे ज्ञानही ठेवावे लागते. सोबतच तेवढेच सतर्क राहावे लागते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ क्षीण होऊ नये याची जबाबदारी पत्रकारांवरच आहे. मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेचे आपले सिद्धान्त आहेत. त्या सिद्धान्ताची आठवण पत्रकारांनी ठेवावी, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी बल्लारपुरात पत्रकारांपुढे मांडले.पत्रकार दिनी बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून तहसीलदार दयानंद भोयर, मुख्याधिकारी विपीन मुदधा, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, बल्लारपूर पेपर मिलचे एच.आर. महाव्यवस्थापक आनंद बर्वे उपस्थित होते. मंचावर असोसिएशनचे मार्गदर्शक वसंत खेडेकर, अध्यक्ष अजय दुबे, महासचिव कुमार फुलमाळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुदधा म्हणाले पत्रकारांनी समाज परिवर्तनाचे काम केले आहे. त्यांनी सत्य तेच लिहावे. उगीच वादाला हवा देऊन बातम्यांद्वारे लोकांना भ्रमित करु नये, असे म्हणत वाचकांनी अग्रलेख वाचावे. त्यात वैचारिक मुद्दे असतात, असा आग्रह त्यांनी केला. भोयर, सिरस्कर, बर्वे यांनीही वर्तमानपत्र आणि पत्रकार यावर विचार मांडले. या कार्यक्रमात असोसिएशनद्वारे, शहरातील सर्वच पेपर एजटंचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. योगेश खेडेकर तर आभार भाउसाहेब येगीनवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)