शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

पीक वाचविण्यासाठी आसोलामेंढा तलावाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

मूल : पावसाने गेल्या १५ दिवसांपासून डोळे वटारल्याने धान रोवणीसाठी शेतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे संकटात ...

मूल : पावसाने गेल्या १५ दिवसांपासून डोळे वटारल्याने धान रोवणीसाठी शेतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेले पाणी आसोलामेंढा जलाशयामधून सोडावे, अशी मागणी मूल तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हवामान खात्याने यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस येईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत धानाची पेरणी केली. मात्र आजघडीला पाऊस नसल्याने तालुक्यातील भवराळा, राजगड, चांदापूर, जुनासुर्ला, गडीसुर्ला, फिस्कुटी, विरई आदी शेतकरी हवालदील झाले आहेत. अनेक गावांतील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीच्या चालू हंगामात प्रारंभी चांगला वा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी धान रोवणी करणे सोयीचे व्हावे म्हणून धान पऱ्हे पेरणी केली. पेरणी केलेले धान रोवणीच्या दृष्टीने तयार होत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धान रोवणीच्या दृष्टीने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस येत नसल्याने पेरणी केलेले धानाचे पऱ्हे सुकायला लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळून शेतीचा हंगाम लांबणीवर जाऊ शकतो, असे झाल्यास दुबार पेरणी करीता शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाही. दुबार पेरणीकरिता पुन्हा बाजारामधून बियाणे खरेदी करणे भाग पडेल आणि सध्याच्या कोरोना महामारीच्या आर्थिक संकट काळात बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. ही वास्तविकता लक्षात घेऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तातडीने आसोलामेंढा जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार, शांताराम कामडे संचालक, गौरव पुपरेड्डीवार, प्रदीप कामडे, अनिल निकेसर, गणेश खोब्रागडे, तयूब खाॅ पठान, तुळशिराम मोहुर्ल, रूमदेव गोहणे, लोकनाथ नरमलवार आदी शेतकऱ्यांनी आसोलामेंढा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन देण्यात आले.