शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

4,779 बेरोजगारांची नोंदणी; 1,358 उमेदवारांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी  शासनाने लाॅकडाऊन केले. या कालावधीत हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला. युवक- युवतींना रोजगारा मिळण्याचे मार्ग बंद झाले. आयुष्य कसे उभे करायचे हा प्रश्न पुढे आला होता. याच कालावधीत  शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे बेरोजगारांची नोंदणी सुरू होती. जिल्ह्यात ४ हजार ७७९ बेरोजगारांनी नोंदणी केली. या बेरोजगारांना व्यवसाय काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाले.

ठळक मुद्दे लाॅकडाऊन काळातील स्थिती : युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे धडे

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : कोरोना लाॅकडाऊन कालावधीत  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागात ४ हजार ७७९ बेरोजगार युवक-युवतींनी रोजगारासाठी  नोंदणी केली होती. यातील १ हजार ३५८ उमेदवारांना रोजगार मिळाला. काही युवकांनी स्वयंरोजगार सुरू करून बेरोजगारीवर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी  शासनाने लाॅकडाऊन केले. या कालावधीत हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला. युवक- युवतींना रोजगारा मिळण्याचे मार्ग बंद झाले. आयुष्य कसे उभे करायचे हा प्रश्न पुढे आला होता. याच कालावधीत  शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे बेरोजगारांची नोंदणी सुरू होती. जिल्ह्यात ४ हजार ७७९ बेरोजगारांनी नोंदणी केली. या बेरोजगारांना व्यवसाय काैशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाले.  जिल्ह्यात व राज्यभरात उपलब्ध होणा-या  विविध आस्थापनांमधील रोजगार व नोक-यांची माहिती देण्यात आली. त्यामुळे १ हजार ३५८ बेरोजगारांना नोकरी मिळाली. लाॅकडाऊन हा संकटांचा कालावधी  होता.  या कालावधीत रोजगार मिळवून दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

अधिकाऱ्याचा कोटजिल्ह्यात १ माचर्च ते ३० नोव्हेंबर दरम्यान नोंदणी केलेल्या १ हजार ३५८ बेरोजगार उमेदवारांना नाेकरी उपलब्ध करून देण्यात आली. बेरोजगारांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या. विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहेत. कोरोना कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्ण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. याचाही युवक-युवतींनी लाभ घेतला आहे.        - भय्याजी येरमे, सहाय्यक आयुक्त काैशल्य रोजगार व उद्योजकता, चंद्रपूर

माच महिन्यात ८०३ जणांची नाेंदणीचंद्रपूर हा उद्योगप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. नोंदणीकृत उद्योग संस्थांची संख्या बरीच आहे. मात्र, लाॅकडाऊन सुरू झाल्याने उद्योगांवर मरगळ आली. या तणावग्रस्त काळातील मार्च महिन्यातही ८०३ बेरोजगारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागात नोंदणी केली.  एप्रिल ४२, मे ७७, जून ४७४, जुलै २०८८, ऑगस्ट ४७४, सप्टेंबर ४७१, आऑक्टोबर १९५, नोव्हेंबर १५५ अशी महिनानिहाय नोंदणी करण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात सवर्वत्र बंद असल्याने शासनाच्या आदेशानुसार बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाइईन प्रशिक्षण घेण्यात आले. बेरोजगारांनी या प्रशिक्षणाचाही लाभ घेऊन स्वयंरोजगार योजनांचा लाभ घेतला.

तरूण काय म्हणतात?

कोरोनामुळे सवर्वच क्षेत्रावर विघातक परिणाम झाला. मात्र, बेरोजगारांचे मोठे हाल सुरू आहेत. शिक्षणाचे प्रमाण वाढले. मात्र, त्या तुलनेत रोजगार उपलब्ध नाही. राज्य सरकारने केवळ आश्वासने न देता बेरोजगारीसाठी ठोस  धोरण तयार केले पाहिजे. - श्रीकांत भेंडे, चंद्रपूर

जिल्ह्यात बेरोजगारी वाढली. युवक-युवतींच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते प्रचंड निराशेत आहेत. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागातून योजनांची माहिती मिळते. परंतु, व्यवसाय सुरू करण्यास बँकांकडून खुल्या मनाने मदत मिळत नाही. हे चित्र बदलावे.  - अंतबोध बोरकर, सावली

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, गुणवत्तेतही पुढे आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी अत्यंत कमी आहेत. त्यामुळे पुणे- मुंबईकडे जावे लागते. परंतु, अनेकांना हे शक्य होईलच याची खात्री नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना येथेच रोजगार मिळाला पाहिजे.- प्रणाली जांभुळे,  बाबुपेठ, चंद्रपूर

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी