शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजना कुचकामी

By admin | Updated: May 5, 2016 01:29 IST

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे.

तीन गावात पाणी टंचाई : नागरिक त्रस्तदेवाडा (बु) : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे. या योजनेत देवाडा बुज. गावासह बोंडाळा बुज., बोंडाळा खुर्द आदी गावे अंतर्भूत आहेत. परंतु, तिन्ही गावातील पाणीपुरवठा मागील एक महिन्यापासून कायमचा बंदस्थितीत असल्याने या गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. उन्हाच्या तीव्र दाहकतेने परिसरातील पाण्याचे जलस्त्रोत आटले असून जलवहिन्या ठप्प झाल्या. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील महिला वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकण्याची पाळी आली आहे. तीनही गावात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी हाहाकार असल्याने पिण्याच्या पाण्याची सर्वत्र झळ पोहचली आहे. जनावरांनासुद्धा पाणी मिळणे या गावात कठीण काम झाले आहे. पाणी हे जीवन असून पाण्याविना जीवन कासाविसा होत असते. पिण्याच्या पाण्याची मूलभूत गरज समजल्या जाऊन त्याची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परंतु शासनाचा पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्याच्या दिवसातच दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाईची समस्या गावात निर्माण झाली आहे. या मात्र अधिकारी मुद्दाम डोळेझाक करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहे. तीनही गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाप्रती असंतोषाची लाट पसरली आहे. त्यामुळे घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. गावात पाणी टंचाई असल्याने देवाडा बुज. येथील नागरिक एक किमी अतरावर असलेल्या वैनगंगा उपनदीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. काही जण तर चक्क बैलबंडी जुंपून पाणी आणत आहेत. परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न बिकट असून पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहे की काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गावातीलल पाणी समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)