शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर पासबुक देण्यास नकार

By admin | Updated: April 13, 2017 00:52 IST

विविध राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना शुन्य बचतीवर बँकेमध्ये खाते उघडता येतील, ....

पालकांना मनस्ताप : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणीनवरगाव : विविध राष्ट्रीय बँकांमध्ये शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना शुन्य बचतीवर बँकेमध्ये खाते उघडता येतील, असे पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरसुद्धा बँकाकडून एक-दोन हजार रुपये जमा केल्याशिवाय पासबुक मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.भारतातील प्रत्येक नागरिक हा राष्ट्रीयकृत बँकेसोबत जुळला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शून्य बचतीवर खाते उघडता येईल, असे सांगितले होते. काही बँकांनी याला प्रतीसाद देऊन खाते उघडून घेतले. मात्र हळूहळू काही बँकांनी झिरो बॅलन्स नाही तर एक-दोन हजार रुपये खात्यावर जमा केल्याशिवाय पासबूक देणेच बंद केले आहे.शेतकऱ्यांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या खात्यावर शासनाकडून दिला जातो. त्यासाठी त्याला राष्ट्रीयकृत बँकांचे पासबूक आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप परीक्षा व इतर शैक्षणिक परीक्षा, उपस्थिती भत्ता अशा विविध योजनांसाठी आता विद्यार्थ्यांना खाते खोलणे बंधनकारक केले आहे. खाते खोलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कायदपत्रांसह पायपीट करावी लागते. शिवाय वेळेवर कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक खर्च येतोच. यासाठी काही बँकेत एक- दोन दिवसातच पासबुक बनवून दिले जाते तर काही बँकांमध्ये पासबुक मिळण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत आहे. एक- दिड महिना वाट पहिल्यावर पासबुक आणण्यासाठी जसे एसबीआय शाखा सिंदेवाही येथे गेल्यानंतर प्रथम एक ते दोन हजार रुपये खात्यावर जमा करा. त्यानंतरच पासबुक तुम्हाला मिळेल, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्कॉलरशीप परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच इतरांनासुद्धा मनस्ताप सहन करावा लागत आहे.प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सारखीच नसून वेळेवर एक-दोन हजार रुपये खात्यात टाकणे शक्य होत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांनी कधीच बँकामध्ये खाते खोलून आर्थिक व्यवहार केले असते. नुकतीच आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचा निकाल लागला असून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, त्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व इतर कागदपत्रे तर काही शाळांसाठी केवळ एसबीआय बँकेचे पासबुक काढणे बंधनकारक केले आहे. एक - दिड महिना पासबुक मिळण्यासाठी व पासबुक तयार झाल्यानंतर दोन हजार रुपये पालकांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, असा बँकेचा फतवा असल्याने अडचणी वाढलीे आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)