शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

रेतीअभावी भूमिगत कोळसा खाणीतील उत्पन्नात घट

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

माजरी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या जागी भरण्याकरीता रेती मिळणे बंद झाले आहे.

वरोरा : माजरी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या जागी भरण्याकरीता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरुन शकत नसल्याने प्रतिदिवस १ हजार १00 टन उत्पादन देणारी खाणीतून मागील पाच महिन्यांपासून प्रतिदिन केवळ ३00 टन कोळसा उत्पादन होत आहे. त्यामुळे स्थायी कामगारांमध्ये असुरक्षिततचे वातावरण पसरले असून रेतीअभावी भूमिगत कोळसा खाणीत आग लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या ठिकाणी पाणीमिश्रीत रेती भरण्यात येते. त्यानंतर पुढील कोळसा काढण्यात येतो. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता कमी असल्याने भूमिगत कोळसा खाणीतील कामगारही सुरक्षित राहतात. रेतीचा भरणा केला नाही तर मोठा अपघातही होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रेतीअभावी आग लागण्याची शक्यता अधिक असते. भूमिगत कोळसा खाणीत उत्पादनाच्या १.८ टक्के रेतीचा भरणा करणे आवश्यक असते.

माजरी भूमिगत कोळसा खाणीत १ हजार ३९ स्थायी कामगार कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून पाच हेक्टर आराजी असलेल्या घाटातील रेती काढण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागते. वेकोलिच्यावतीने पर्यावरण विभागाकडे रेतीच्या मंजुरीकरिता प्रकरण पाठविण्यात आले आहे. यासाठी पर्यावरण विभागाची एक चमू येऊन निरीक्षण करून गेली. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सध्या कोळसा काढलेल्या ठिकाणी मि२िँं१्रूँं१त माती भरण्यात येत आहे. १ हजार १00 टन प्रतिदिन उत्पादन देणार्‍या भूमिगत खाणीत दिवसाकाठी ३00 टन उत्पादन होत आहे.

रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट आल्याने कामगारांमध्ये भीती व्यक्त केल्या जात आहे. उत्पादनात घट आल्याने कामगारांचे स्थानांतरण इतरत्र केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार वणी, वरोरा, माजरी परिसरात स्थायी झाले आहेत. त्याचे स्थानांतरण झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही त्याची झळ सोसावी लागणार आहे. रेती उपलब्ध झाली नाही तर माजरी येथील भूमिगत कोळसा खाण बंद होण्याची शक्यता कर्मचार्‍यांमध्ये वर्तविली जात आहे.

माजरी भूमिगत कोळसा खाणीसाठी तातडीने रेती उपलब्ध करून द्यावी व भूमिगत कोळसा खाण बंद पडू नये, याकरीता प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री दीपक डोंगरवार यांनी केली आहे.

मागील काही महिन्यांपासून रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. रेतीकरिता १ करोड ६0 लाख रुपये शासनाला देणे आहे. त्यातील ४४ लाखांचा भरणा केला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. उत्पादनात घट झाल्याने कामगारांना अतिरिक्त सुविधा देता येत नाही. एक महिन्यात रेती मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (तालुका प्रतिनिधी)