शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

रेतीअभावी भूमिगत कोळसा खाणीतील उत्पन्नात घट

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

माजरी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या जागी भरण्याकरीता रेती मिळणे बंद झाले आहे.

वरोरा : माजरी भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या जागी भरण्याकरीता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरुन शकत नसल्याने प्रतिदिवस १ हजार १00 टन उत्पादन देणारी खाणीतून मागील पाच महिन्यांपासून प्रतिदिन केवळ ३00 टन कोळसा उत्पादन होत आहे. त्यामुळे स्थायी कामगारांमध्ये असुरक्षिततचे वातावरण पसरले असून रेतीअभावी भूमिगत कोळसा खाणीत आग लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा काढल्यानंतर त्या ठिकाणी पाणीमिश्रीत रेती भरण्यात येते. त्यानंतर पुढील कोळसा काढण्यात येतो. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता कमी असल्याने भूमिगत कोळसा खाणीतील कामगारही सुरक्षित राहतात. रेतीचा भरणा केला नाही तर मोठा अपघातही होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रेतीअभावी आग लागण्याची शक्यता अधिक असते. भूमिगत कोळसा खाणीत उत्पादनाच्या १.८ टक्के रेतीचा भरणा करणे आवश्यक असते.

माजरी भूमिगत कोळसा खाणीत १ हजार ३९ स्थायी कामगार कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून पाच हेक्टर आराजी असलेल्या घाटातील रेती काढण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागते. वेकोलिच्यावतीने पर्यावरण विभागाकडे रेतीच्या मंजुरीकरिता प्रकरण पाठविण्यात आले आहे. यासाठी पर्यावरण विभागाची एक चमू येऊन निरीक्षण करून गेली. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सध्या कोळसा काढलेल्या ठिकाणी मि२िँं१्रूँं१त माती भरण्यात येत आहे. १ हजार १00 टन प्रतिदिन उत्पादन देणार्‍या भूमिगत खाणीत दिवसाकाठी ३00 टन उत्पादन होत आहे.

रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट आल्याने कामगारांमध्ये भीती व्यक्त केल्या जात आहे. उत्पादनात घट आल्याने कामगारांचे स्थानांतरण इतरत्र केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार वणी, वरोरा, माजरी परिसरात स्थायी झाले आहेत. त्याचे स्थानांतरण झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही त्याची झळ सोसावी लागणार आहे. रेती उपलब्ध झाली नाही तर माजरी येथील भूमिगत कोळसा खाण बंद होण्याची शक्यता कर्मचार्‍यांमध्ये वर्तविली जात आहे.

माजरी भूमिगत कोळसा खाणीसाठी तातडीने रेती उपलब्ध करून द्यावी व भूमिगत कोळसा खाण बंद पडू नये, याकरीता प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री दीपक डोंगरवार यांनी केली आहे.

मागील काही महिन्यांपासून रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. रेतीकरिता १ करोड ६0 लाख रुपये शासनाला देणे आहे. त्यातील ४४ लाखांचा भरणा केला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. उत्पादनात घट झाल्याने कामगारांना अतिरिक्त सुविधा देता येत नाही. एक महिन्यात रेती मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (तालुका प्रतिनिधी)