शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यातील अंगणवाडी पदभरती ऐनवेळी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:38 IST

मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आल्याची नोटिस कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावल्याने निवड झालेल्या उमेदवारात कमालीची नाराजी असून रोष व्यक्त केल्या जात आहे.

ठळक मुद्देउमेदवारांमध्ये रोष ; चौकशी करून नियुक्तीपत्र देण्याची मागणीसंडे स्पेशल...

शशिकांत गणवीर।भेजगाव : मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आल्याची नोटिस कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावल्याने निवड झालेल्या उमेदवारात कमालीची नाराजी असून रोष व्यक्त केल्या जात आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत मूल तालुक्यातील येसगाव, उथळपेठ, खालवसपेठ, मंदातुकुम, कोरंबी, चिखली, उश्राळा, डोंगरगाव, बेंबाळ आदी गावात अंगणवाडी सेविका व मदतनिस या पदाकरिता ११ फेब्रुवारीला जाहिरनामा ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात आला. समितीद्वारे गुण पडताळणी करुन तशी निवड यादी २७ फेब्रुवारीला लावण्यात आली. व अंतिम निवड यादी १३ मार्चला लागणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्याने आचारसंहिता संपेपर्यंत पदभरती प्रक्रिया स्थगित करुन पुढील प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर राबविण्यात येणार असा जाहिरनामा १३ मार्चला लावण्यात आला.आचारसंहिता संपूनही एक ते दोन महिने लोटल्यानंतरही निवड प्रक्रिया सुरु झाली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अनेकदा कार्यालयात जाऊन विचारणा केली. तेव्हा पुढील प्रक्रियेला उशीर असल्याचे सांगण्यात आले. व एनवेळेवर कोणतेही ठोस कारण नसताना व गावातील उमेदवारांची कोणती तक्रारी नसताना १३ जुनला पदभरती रद्द झाली असून नव्याने पदभरती घेण्यात येईल असा जाहिरनामा कार्यालयात लावण्यात आला. त्यामुळे उमेदरांमध्ये रोष व्यक्त होत आहे.जिल्हातील सर्वच तालुक्यात पदभरती पूर्ण झाली असुन नियुक्ती पत्र देऊन उमेदवार रुजूही झाले आहेत. मात्र कोणताही शासन निर्णय नसताना मूल येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्याच मनमर्जीने पदभरती रद्द केल्याने उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करुन पदभरती पूर्ववत करावी, अशी मागणी मुख्य कार्यपालन अधिकाºयाला मालता वाढई, धम्मदीपा वाळके, सावित्री चिचघरे, सपना वाडगुरे, अस्मिता वाळके, अश्विनी कडस्कर, भाग्यश्री कोरडे, लता आत्राम, संघा उराडे, चेतना निलमवार आदिंनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.भरती प्रक्रिया घेणाºयाला पदभरती रद्द करण्याचा अधिकार आहे. कागदपत्र घेताना उमेदवारांना पोच पावती दिली नाही. त्यामुळे काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पदभरती रद्द करण्यात आल्याची माहिती मूल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शिवगंगा पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.