शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

अर्ध्या एकरात शेतकऱ्याने घेतले कारल्याचे विक्रमी उत्पादन; आधुनिक पद्धतीने केली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:25 IST

राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.

ठळक मुद्देवरोडा येथील शेतकऱ्यांची यशोगाथा

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतीची अवस्था अधिकच बिकट होत असतानाच राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने घरातील मंडळी शेतात दिवसरात्र राबत असतात. घरातील प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात. त्यांच्या सात एकर शेतीत ते विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. त्यांनी शेतात कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह कारली, हळद, ढेमसे, शेंगा, कोबी, टमाटर, वांगे या पिकांसह भाजीपाला पिके घेतली आहेत.किशोर नांदेकर यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात कारल्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी शेतात आधुनिक पद्धतीचा वापर केला. त्यांनी सुरुवातीलाच ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले आहे. अजूनही ते कारल्याचे उत्पादन घेत असून कारले लागल्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना २०० क्विंटल कारल्याचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यासाठी ते शेतात मोठी मेहनत घेत असतात. राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग, कृषी पर्यवेक्षक टी.जी.आडे व कृषी सहाय्यक यांचे यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. एकीकडे शेतीला अवकळा आली असताना वरोडा येथील शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकºयांना आशेचा नवा किरण ठरणार आहे.निसर्गाची अवकृपा, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकऱ्यानी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले असून पुन्हा २०० क्विंटलपर्यंत कारल्याचे उत्पादन होऊ शकते.-किशोर नांदेकरप्रगतशील शेतकरी, वरोडा.

टॅग्स :agricultureशेती