शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य ...

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य दिल्या जाते. विशेष म्हणजे, अनेकवेळा दुकानदार तसेच कार्डधारकांमध्ये धान्य देण्यावरून तसेच इतरही कारणामुळे खडके उडतात. अशावेळी कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा कार्डधारक घर बदलवितात. त्यामुळे ते रेशनपासून वंचित राहण्याची भीती असते. त्यामुळे शासनाने रेशन दुकान पोर्टेबिलिटी योजना सुरू केली आहे.यानुसार ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार रेशन दुकान बदलविणे सहज शक्य झाले आहे. जिल्ह्यात ६ हजार ३०४ नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रेशन दुकान बदलवित या योजनेचा लाभ घेतला आहे.

बाॅक्स

एकूण रेशन कार्डधारक- ४,५७,३२९

बीपीएल-२,६१,०३१

अंत्योदय-१,३७,१४५

केशरी-५९,१५३

किती जणांनी दुकानदार बदलला-६३०४

बाॅक्स

कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार

बल्लारपूर ७१६

भद्रावती ५३७

ब्रह्मपुरी ८५

चंद्रपूर ८१४

चंद्रपूर शहर १७८१

चिमूर ४६७

गोंडपिपरी १८

जिवती ७२

कोरपना ८९

मूल-८९

नागभीड १८३

पोंभूर्णा ३४

राजुरा २७०

सावली ३१

सिंदेवाही ४०

वरोरा १०७८

एकूण ६३०४

बाॅक्स

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये रेशन दुकान पोर्टेबिलिटीचा लाभ घेण्याची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात जून महिन्यामध्ये तब्बल १ हजार ७८१ कार्डधारकांनी दुकानदार बदलला आहे. त्यानंतर वरोरा तालुक्यात १ हजार ७८ जणांनी रेशन दुकान बदलविले आहे. काही दुकानदारांसोबत उडणाऱ्या खटक्यांमुळे तर काहींनी दुसरीकडे घर बदलविल्यामुळे रेशन दुकान पोर्टेबिलिटी केली आहे. गोंडपिपरी तालुक्यात केवळ १८,सावलीत ३१,पोंभूर्णामध्ये ३४ जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.

बाक्स

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना संकटामुळे यावर्षी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्यक्रम तसेच अंत्योदयच्या कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात आहे. त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतही याच कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांना धान्य मिळणार आहे.