शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर ग्रामीण रुग्णालय रामभरोसे

By admin | Updated: March 8, 2016 00:42 IST

गडचांदूर रुग्णालय रामभरोसे असून पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे कमतरता आहे.

रुग्णांना पिण्याचे पाणी नाही : दवाखानाच पडला आजारीगडचांदूर : गडचांदूर रुग्णालय रामभरोसे असून पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे कमतरता आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी बाहेरून पाणी आणावे लागत आहे. सरकारी दवाखान्यातील हे वास्तव रविवारी रात्री निदर्शनास आले.नजीकच्या बिबी येथील तुळशीराम बावणे (४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तब्बेत अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. शवविच्छेदनासाठी उशीर होतो म्हणून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिल्याने त्यांचा मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागली. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयच आजारी पडल्याने याठिकाणी सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. येथे डॉक्टरांचा उर्मटपणा रुग्णांना दिलासा न देता रक्तदाब वाढवणारा ठरतो. अनेकदा गडचांदूरातील पुढारी उपोषण व आंदोलने करतात. मात्र त्याचा रुग्णालयाच्या विकासात कसलाही फरक आतापर्यंत पडला नाही. जेथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, त्या दवाखान्याची अवस्था काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. गडचांदूर व जिवती परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून हा एकमेव दवाखाना आहे. मात्र या दवाखान्याकडून रुग्णांनी काय अशा करावी, हा प्रश्नच आहे. नगर परिषदेतील रुग्णालय समिती अनेकदा भेट देतात. मात्र कोणत्या समस्या जाणून घेतात, हे त्यांनाच ठाऊक आहे. राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, पदाधिकारी व रुग्णालय समिती डोळे बंद करून स्वत:ची पोळी शेकून घेण्यापुरतीच राहिल्याने सामान्य रुग्णांनी कोणाकडे धाव घ्यावी, हा प्रश्नच आहे. (शहर प्रतिनिधी)