शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

निधीअभावी रमाई योजना रखडली

By admin | Updated: July 22, 2014 23:56 IST

शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे जिवनमान उंचावावे व हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना समाजकल्याण विभागामार्फत रमाई घरकूल

देवाडा खुर्द : शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे जिवनमान उंचावावे व हक्काचा निवारा मिळावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना समाजकल्याण विभागामार्फत रमाई घरकूल योजना सुरु केली. मात्र पोंभुर्णा पंचायत समितीमध्ये निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर योजना रखडली आहे. त्यामुळे अनेकांचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब नवबौद्धांचे जिवनमान उंचावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने समाजकल्याण विभागामार्फत सन २००८ पासून रमाई घरकुल योजना सुरु केली. सदर योजनेअंतर्गत पोंभुर्णा येथे ६० लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरीसुद्धा दिली. परंतु घरकुलाचे काम सुरु करण्याविषयी लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता आमच्याकडे काहीच नाही. पंचायत समितीकडे माहिती विचारा, असे सांगतात. तर याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडे विचारणा केली असता संबंधित कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत संबंधित योजनेचा निधीच आला नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर योजनेचे तीन-तेरा वाजले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा येथे या योजनेची अशी अवस्था आहे तर, ग्रामीण भागात काय स्थिती असेल, असा प्रश्न परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सदर योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना ग्रामीण क्षेत्रामध्ये घराच्या बांधकामासाठी कमाल मर्यादा एक लाख रुपये आहे. शासनस्तरावर गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाविध योजना राबविल्या जात असल्या तरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे महत्त्वाच्या योजनांचा लाभ पाहिजे त्या प्रमाणातत लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यासह संपूर्ण परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे बरेच नागरिक पडक्या घरात वास्तव्य करीत आहेत. आज ना उद्या घरकूल योजनेचा लाभ मिळेल, या विवंचनेत असणाऱ्या या गरीब नवबौद्ध लाभार्थ्यांना निवाऱ्याचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लाभार्थ्यांना घरकूल योजनेच लाभ मिळवून द्यावा व समाजकल्याण विभागाने निधी उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी अशोक गेडाम यांनी केली आहे. (वार्ताहर)