शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. हा पाणी धान पिकांसाठी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा कृषी प्रधान आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान, कापूस, सोयाबीनचेे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे वरच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना शेती करावी लागते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. कडक ऊन तापत असल्याने पीक कोमेजायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र मंगळवारी व बुधवारी पावसाने जिल्ह्याभरात चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली आहे. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे.

निंदनासाठी मजूर मिळेना

चंद्रपूर : वेळी-अवेळी पाणी आल्याने धान पिकांत मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निंदन सुरु झाले आहे. मात्र निंदनासाठी मजूर भेटणे कठीण झाले आहे.

शेतात उभारा पक्षी थांबे

चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे आदी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी शेतात विविध ठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.