शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. हा पाणी धान पिकांसाठी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा कृषी प्रधान आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान, कापूस, सोयाबीनचेे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे वरच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना शेती करावी लागते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. कडक ऊन तापत असल्याने पीक कोमेजायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र मंगळवारी व बुधवारी पावसाने जिल्ह्याभरात चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली आहे. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे.

निंदनासाठी मजूर मिळेना

चंद्रपूर : वेळी-अवेळी पाणी आल्याने धान पिकांत मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निंदन सुरु झाले आहे. मात्र निंदनासाठी मजूर भेटणे कठीण झाले आहे.

शेतात उभारा पक्षी थांबे

चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे आदी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी शेतात विविध ठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.