शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST

शेतकरी पुन्हा संकटात सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत ...

शेतकरी पुन्हा संकटात

सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले, त्यांची फरतफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत. यावर्षी धान उत्पादनही कमी झाले असून त्यांनी पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे.

जिवती तालुक्यात विजेचा लपंडाव

जिवती : जिवती तालुक्याील पाटण परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दाताळा मार्गावर गस्त वाढवावी

चंद्रपूर: दाताळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मजनुंचा सुळसुळाट असतो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन मजनुंना समज द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रेमीयुगुल निर्जनस्थळी जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.