शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जेष्ठ नागरिकांची दीड वर्षांपासून रेल्वे सवलत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

मंगल जीवने बल्लारपूर : मागील १७ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवासात गर्दी वाढू नये, यासाठी नियमित गाड्या बंद ...

मंगल जीवने

बल्लारपूर : मागील १७ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवासात गर्दी वाढू नये, यासाठी नियमित गाड्या बंद करून विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे जीवन वेदनादायक झाले आहे. जेष्ठ नागरिक असो, कॅन्सर पीडित असो की हार्ट पेशंट, सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांमधून सवलत मिळत नसल्यामुळे कोणीही वरिष्ठ नागरिक प्रवास करू शकत नाही. महिलांचा खास डब्बाही विशेष गाड्यात नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पहिल्या लॉकडाऊनपासून नियमित चालणाऱ्या रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद करून विशेष गाड्या सुरु केल्या. संध्या सुरु असलेल्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाश्यांच्या कोणत्याही श्रेणीसाठी सूट देण्यात येत नाही. प्रवाश्यांना आरक्षण करूनच तिकीट घ्यावे लागते. वेळेवर तिकीट मिळणे बंद आहे. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पसरण्यापासून नियंत्रित करण्यासाठी व कोविडच्या महामारीमुळे प्रवाश्यांची गर्दी कमी करण्यासाठी पहिल्या लॉकडाऊनपासून भारतीय रेल्वेच्या देशात शेकडो विशेष उत्सवाच्या गाड्या धावत आहेत. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वरिष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर अत्यंत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हेच नाही तर सर्वसाधारण गरीब लोकांनाही जनरल कोचमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे सामान्य प्रवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. पूर्ववत रेल्वे गाड्या सुरू करून रेल्वे सवलत सुरू करण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

या सवलती आहेत बंद

-ऑफिसच्या कामासाठी जाणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्युटी पास कोटा.

-रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मिळणार नॉन ऑफिशियल प्रवासासाठी मिळणार कोटा.

- आर्मी, सीआरपीएफसारख्या कोणत्याही स्पेशल फोर्सच्या भारतीय डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्यांना किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सवलत मिळत होती.

- पार्लियामेंट हाऊस कोटा

या कोट्याअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मंत्री सुप्रीम कोर्ट आणि हायचे जज आणि आमदार यांना फायदा मिळत होता.

- ६० वर्षांच्या वर असलेले पुरुष व ५८ वर्षांच्या वर असलेल्या महिलांना रेल्वेची सवलत मिळत होती.

- विदेशातून येणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येत असे.

- व्हीआयपी नेता किंवा युनियनचे पदाधिकारी व इतर काही विभागांना वेगवेगळ्या कोट्याअंतर्गत आरक्षण करण्याची मुभा होती. त्या माध्यमातून तिकीट कन्फर्म होत होते.

- ज्या महिला ४५ वर्षांच्या वर आहे व गर्भवती आहे, अशा महिलांनाही आरक्षणाचा फायदा मिळत होता.

कोट

बल्लारशाह स्थानकावरून २५ टक्के गरीब ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने ग्रस्त रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सवलतीचा फायदा मिळत होता. ही सवलत बंद झाल्यामुळे त्यांची फजिती झाली आहे.

- जयकरण सिंग बजगोती, सदस्य डीआरयूसीसी,मध्य रेल्वे.

120721\hendicap.jpg

आरक्षित कोच