शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
4
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
5
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
6
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
7
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
8
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
9
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
10
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
11
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
12
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
13
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
14
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
15
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
16
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
17
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
18
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
19
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
20
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

सव्वा लाख हेक्टरवर रबी पेरणी

By admin | Updated: October 31, 2015 01:56 IST

यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

खरीप हंगामातील अपयश पुसणार : शेतकऱ्यांची लगबग सुरूचंद्रपूर : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच लगबग सुरू केली असून यावर्षी अनेकांची जमीन खरीप हंगामात पडिक राहिल्याने रबीचा पेरा वाढणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या आराखड्यानुसार यावर्षी जवळपास सव्वा लाख हेक्टरवर रबी पीक पेरणी होणार आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्यासाठी अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात यावर्षी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम हातातून गेला असला तरी रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले कर्ज फेडण्याचे अनेक शेतकरी विचार करीत आहेत. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पिके अंतिम टप्प्यात असून रबी पीक पेरणीसाठी बियाणे जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामात पावसाअभावी पीक करपून गेले किंवा पेरणी करता आली नाही, अशा शेतकऱ्यांची जमिन आधीच पडीत असल्याने आतापासून रबी पेरणीला सुरूवात केली आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. या पिकांची शेतकऱ्यांना पेरणी करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव सुरू केली असून कृषी विभागानेही शासनाकडे बियाणांची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वरोरा उपविभागात सर्वाधिक क्षेत्ररबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार आहे. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे नियोजन असून आतापर्यंत १०१५ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यात वरोरा तालुक्यात ४६० हेक्टर, भद्रावती १९५ हेक्टर तर चिमूर तालुक्यात ३६० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.गहू आणि हरभरा पिकाला अधिक पसंतीरबी हंगामात ज्वारी, तिळ, मका, लाखोळी व इतर कडधान्याची पेरणी होत असली तरी शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती गहू आणि हरभरा पिकाला आहे. गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार ४० असून हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९८० हेक्टर आहे. यात आतापर्यंत गहू पीक ४९ हेक्टरवर तर हरभरा पिकाची १ हजार २२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.