शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख हेक्टरवर रबी पेरणी

By admin | Updated: October 31, 2015 01:56 IST

यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

खरीप हंगामातील अपयश पुसणार : शेतकऱ्यांची लगबग सुरूचंद्रपूर : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच लगबग सुरू केली असून यावर्षी अनेकांची जमीन खरीप हंगामात पडिक राहिल्याने रबीचा पेरा वाढणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या आराखड्यानुसार यावर्षी जवळपास सव्वा लाख हेक्टरवर रबी पीक पेरणी होणार आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्यासाठी अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात यावर्षी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम हातातून गेला असला तरी रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले कर्ज फेडण्याचे अनेक शेतकरी विचार करीत आहेत. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पिके अंतिम टप्प्यात असून रबी पीक पेरणीसाठी बियाणे जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामात पावसाअभावी पीक करपून गेले किंवा पेरणी करता आली नाही, अशा शेतकऱ्यांची जमिन आधीच पडीत असल्याने आतापासून रबी पेरणीला सुरूवात केली आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. या पिकांची शेतकऱ्यांना पेरणी करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव सुरू केली असून कृषी विभागानेही शासनाकडे बियाणांची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वरोरा उपविभागात सर्वाधिक क्षेत्ररबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार आहे. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे नियोजन असून आतापर्यंत १०१५ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यात वरोरा तालुक्यात ४६० हेक्टर, भद्रावती १९५ हेक्टर तर चिमूर तालुक्यात ३६० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.गहू आणि हरभरा पिकाला अधिक पसंतीरबी हंगामात ज्वारी, तिळ, मका, लाखोळी व इतर कडधान्याची पेरणी होत असली तरी शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती गहू आणि हरभरा पिकाला आहे. गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार ४० असून हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९८० हेक्टर आहे. यात आतापर्यंत गहू पीक ४९ हेक्टरवर तर हरभरा पिकाची १ हजार २२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.