शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST

पावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

रत्नाकर चटप - लखमापूरपावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध सुका चारा व कुटाराचा वापर करून जनावरे जगवली. त्यानंतर उन्हाळ्यात याचाच वापर करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी चारा विकत घेऊन जनावरांना खाऊ घातला. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सुरूवातीला शेताच्या बांध्यावर हिरवा चारा दिसून आला. परंतु जनावरांच्या चराईनंतर पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याची वाढ होत नसल्याचे दिसते. अशातच तूर, सोयाबीन, ज्वारी आदी पिके संकटात असल्याने यातून मिळणाऱ्या चाऱ्याची शक्यता मावळली आहे. पिके वाढणार नाही तर चारा कुठून तयार करायचा, असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. यातच काही गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेक गावात छोटे नाले, विहिर, डबके यातून नागरिक दैनंदिन लागणाऱ्या पाण्याचा उपसा करतात. मात्र पाऊस नसल्याने पाण्याची पातळी खालावत आहे. जिवती तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर कोरपना तालुक्यातील काही गावांना अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धपालन व पशुपालन करतात. त्यामुळे साधारणत: एका शेतकऱ्याकडे दोन बैल, एक गाय, वासरू, बकरी आदी जनावरे असतात. मात्र आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पुढे दिसत असल्याने मोठ्या शेतकऱ्यासह लहान शेतकरी बाजारात जनावरांची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांपुढे स्वत:च्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे असताना जनावरांचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पूर्वी शेतीचे आकारमान अधिक असल्याने व चारा क्षेत्र आरक्षित असल्याने शेतकऱ्यांकडे जनावरांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र आता हे प्रमाण घटले असून पशुपालन व दुग्ध व्यवस्थापन धोक्यात आले आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिक होईल की नाही, पाऊस आला तर बरे नाही तर काही नाही. अशी चिंता शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे काही शेतकरी आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी जनावरांची विक्री करीत आहे. राजुरा, कोरपना, गडचांदूर आदी आठवडी बाजारातून शेकडो जनावरांची विक्री केली जात असून जनावरे कत्तलखान्याकडे जात आहे. इच्छा नसताना शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जनावरे विक्रीला काढावी लागत आहे. दुष्काळामुळे हिरवा चारा व कुटाराची मोठी समस्या येत्या काही महिन्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना आधीच धान्य घेऊन कुटुंबाला जगवावे लागते. यातच जनावरांच्या पालनपोषणाचा प्रश्नही अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती पाऊस न आल्याने काही गावात आता निर्माण होत आहे. नदी, नाले, डबक्यात पाणी कमी दिसत असल्याने जनावरांना कसे पाजावे हा यक्ष प्रश्न आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असल्याने शेतकरी जनावरे विक्री करीत आहे तर याचाच फायदा घेत अनेक व्यापारी आंध्रप्रदेशातील आदिलाबाद, आसीफाबाद, कागजनगर, बेला आदी ठिकाणाहून बाजारातून जनावरे खरेदी करीत आहे. अडचणीमुळे शेतकरी मिळेल त्या भावात जनावरे विकत असून सदर जनावरांची आंध्रप्रदेशातील कत्तलखान्याकडे रवानगी होत असल्याचे समजते.