शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 2, 2015 01:00 IST

दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी

६९ कुुटुंबीयांचा विरोध : दीड लाख लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्नचंद्रपूर : दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी या पुलामुळे बाधित होणार असलेल्या नझूलच्या जागेवरील ६९ कुटुंबीयांनी विरोध केला आहे. यामुळे जवळपास दीड लाख लोकांना वेठीस धरत उड्डाणपुलाचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे.वरोरा नाका चौकात चुकीचे नियोजन करून पुलाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे ५० हून अधिक लोकांचे बळी गेले. या चौकातील काही हितसंबंधीयांच्या मालकी हक्काच्या जमिनींना बाधा पोहोचू नये म्हणून राजकीय नेत्यांनी हे बळी घेतले. आता उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याचेसुद्धा डिझाईन चुकले. त्यामुळे नव्याने नकाशा तयार करून काम सुरू आहे. वरोरा नाका उड्डाण पुलाच्या चुकीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामात राजकीय अडसर निर्माण झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बाबूपेठ उड्डाण पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी नागपुरात झालेल्या एका बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बाबूपेठ उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील त्रुटी अजूनही दुरूस्त केलेल्या नाही. रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असले तरी अप्रोचचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.प्रस्तावित बाबूपेठ उड्डाण पुलामुळे नझूलच्या जागेवर असलेल्या ६९ घरांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या घरमालकांनी उड्डाण पुलाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. बाधा पोहोचणार असलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा आता या लोकांची बाजू घेणे सुरू केले आहे. विकासकामे करताना लोकांची मने दुखवायची कशाला, अशी भूमिका घेत काही राजकीय नेत्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी बाबूपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. वास्तविक नझूलच्या जागेवरील अतिक्रमण निघाले तर या पुलाचा प्रश्नच मार्गी लागू शकतो. मात्र केवळ ६९ कुटुंबांची विवंचना करणाऱ्या राजकीय नेत्यांना दीड लाख लोकांचा विसर पडला कसा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. बागला चौकातून बाबूपेठकडे रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर असलेल्या रेल्वेरूळावरून सुपरफास्ट ट्रेन धावत असतात. २४ तासातून १८ ते २० वेळा या मार्गावरचे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ८ ते १० मिनिटे फाटक बंद असते. त्यामुळे गंभीर रुग्णांनासुद्धा फाटक सुरू होईपर्यंत ताटकळत राहावे लागते.या मार्गावर उड्डाण पूल व्हावे, अशी जुनी मागणी आहे. ही मागणी आता मान्य झाली असताना पुलाचे बांधकाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादावर अद्याप कोणताही मार्ग निघाला नसल्याने उड्डाण पुलाच्या टेंडर प्रोसेसचे काम थांबले आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)