शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 2, 2015 01:00 IST

दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी

६९ कुुटुंबीयांचा विरोध : दीड लाख लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्नचंद्रपूर : दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी या पुलामुळे बाधित होणार असलेल्या नझूलच्या जागेवरील ६९ कुटुंबीयांनी विरोध केला आहे. यामुळे जवळपास दीड लाख लोकांना वेठीस धरत उड्डाणपुलाचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे.वरोरा नाका चौकात चुकीचे नियोजन करून पुलाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे ५० हून अधिक लोकांचे बळी गेले. या चौकातील काही हितसंबंधीयांच्या मालकी हक्काच्या जमिनींना बाधा पोहोचू नये म्हणून राजकीय नेत्यांनी हे बळी घेतले. आता उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याचेसुद्धा डिझाईन चुकले. त्यामुळे नव्याने नकाशा तयार करून काम सुरू आहे. वरोरा नाका उड्डाण पुलाच्या चुकीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामात राजकीय अडसर निर्माण झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बाबूपेठ उड्डाण पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी नागपुरात झालेल्या एका बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बाबूपेठ उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील त्रुटी अजूनही दुरूस्त केलेल्या नाही. रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असले तरी अप्रोचचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.प्रस्तावित बाबूपेठ उड्डाण पुलामुळे नझूलच्या जागेवर असलेल्या ६९ घरांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या घरमालकांनी उड्डाण पुलाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. बाधा पोहोचणार असलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा आता या लोकांची बाजू घेणे सुरू केले आहे. विकासकामे करताना लोकांची मने दुखवायची कशाला, अशी भूमिका घेत काही राजकीय नेत्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी बाबूपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. वास्तविक नझूलच्या जागेवरील अतिक्रमण निघाले तर या पुलाचा प्रश्नच मार्गी लागू शकतो. मात्र केवळ ६९ कुटुंबांची विवंचना करणाऱ्या राजकीय नेत्यांना दीड लाख लोकांचा विसर पडला कसा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. बागला चौकातून बाबूपेठकडे रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर असलेल्या रेल्वेरूळावरून सुपरफास्ट ट्रेन धावत असतात. २४ तासातून १८ ते २० वेळा या मार्गावरचे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ८ ते १० मिनिटे फाटक बंद असते. त्यामुळे गंभीर रुग्णांनासुद्धा फाटक सुरू होईपर्यंत ताटकळत राहावे लागते.या मार्गावर उड्डाण पूल व्हावे, अशी जुनी मागणी आहे. ही मागणी आता मान्य झाली असताना पुलाचे बांधकाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादावर अद्याप कोणताही मार्ग निघाला नसल्याने उड्डाण पुलाच्या टेंडर प्रोसेसचे काम थांबले आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)