शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्यापूर्वी खड्डे बुजवा

By admin | Updated: October 6, 2015 01:21 IST

वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या

चंद्रपूर : वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येत्या १४ आॅक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मचक्र अनुवर्तन दिनाचा समारंभ येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. खड्डयामुळे लाखो आंबेडकरी अनुयायांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. १४ आॅक्टोबरपूर्वी या रस्त्यावरील खड्डयांची तातडीने डागडुजी करावी. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशिकांत देशकर यांनी दिला. यासंदर्भातील निवेदन शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.देशकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. पूर्वीच्या कामाचे डिझाईन चुकले. नविन उड्डाण पुलाचीही तिच स्थिती झाली. अर्धेअधीक काम झाल्यानंतर डिझाईन चुकल्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने काम बंद केले. शिवाय रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी जवळपास ५० लोकांना वरोरा नाका चौकात जीव गमवावा लागला. आणखी किती लोकांचा जीव गेल्यानंतर कामाला प्रारंभ करणार आहात, असा सवाल देशकर यांनी उपस्थित केला आहे.यापूर्वी कार्यकारी अभियंत्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत पुल सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कामाला प्रारंभ झाला नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आंबेडकर महाविद्यालयासमोरील मित्रनगर चौकापर्यंतच्या रस्त्यांची कामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तेही हवेतच विरले. आता धम्मचक्र अनुवर्तन दिन लवकरच सुरू होणार आहे. मात्र काम सुरू झाले नाही. चार दिवसांत या मार्गावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देशकर यांनी दिला. निवेदन देताना नगरसेवक संजय वैद्य, सुनिल काळे, महेंद्र लोखंडे, राजेंद्र नागरकर, मुन्ना भाई, शबीरभाई, राजेंद्र माकोडे, नयन महातव, प्रशांत चिप्पावार, प्रतिक भगत, विजय नागापुरे, सुनिल धोत्रे, मुन्ना तावाडे, प्रियदर्शन इंगळे, राजेंद्र आखरे, निमेश मानकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)