शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

५० वर्षांनंतर मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:31 IST

१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देपुनर्वसित नवानगर येथे वॉटर एटीएम मंजूर : नागरिकांना आरोग्य समस्येपासून मिळणार मुक्ती

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत नवानगर समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पुनर्वसन काळात ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले आहे. परिणामी गावातील पाण्याचे स्रोत्र फ्लोराईडयुक्त आहेत. त्यामुळे गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे.प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी कळू लागले तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी मागणी ते करू लागले. २००५ पासून ते या मागणीचा पाठपुरावा करीत होते. पण या मागणीची एकाही लोकप्रतिनिधीने व अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही. दरम्यान या भागाचे जि. प. सदस्य संजय गजपुरे यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा ही मागणी रेटून धरली. आणि अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम लावण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनाही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे.‘लोकमत’ने वेधले लक्षनवानगर या पूनर्वसन गावाच्या पाण्याच्या समस्येकडे लोकमतने अनेकदा वृृत्त प्रकाशीत करुन लक्ष वेधले होते. त्यामुळे आरोग्य यंत्राणा खळबळू जागी झाली. दरम्यान गावात वॉटर एटीएम मंजूर होऊन त्यांचे काम सुरु झाल्याने गावकºयांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.