शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

टंचाईमुक्तीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:37 IST

तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे.

भीषण टंचाई : अंधारी नदीतून देवाड्याला पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. हे गाव टंचाईमुक्त करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांना महिलांनी साकडे घातले. त्यांना निवदनाद्वारे गावात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून बांधलेला जलकुंभ पाण्यासाठी व्याकुळ आहे.देवाडा खुर्द येथील पाणीटंचाई दूर करण्याकरिता पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु अजूनपर्यंत कुठलीच पर्यायी योजना करण्यात आली नाही. देवाडा खुर्दला अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी दिले जाते. या गावाला नदीच्या पात्रात पाणी असेपर्यंतच पाणी मिळते. नदी कोरडी झाली की, पाण्याचा स्रोत बंद होतो. सध्या मे महिना लागण्याआधी अंधारी नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशीच विदारक स्थिती असूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्थायी उपाययोजना केली जात नाही. स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतात आणि निवडून आल्यावर कोठे असतात, हे मतदारांना समजत नाही. ते शोधूनही सापडत नाही. या गावतील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलण्यास कोणीही तयार दिसत नाहीत. पं.स. सदस्या म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या ज्योती बुरांडे या स्वत: या गावात वास्तव्यास आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रश्न लावून धरणे आवश्यक आहे. या गावात पर्यायी व्यवस्था म्हणून लोकसहभागातून भारत ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु त्या योजनेलाही ग्रहण लागले आहे. या योजनेत ५६ लाख रुपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आला. परंतु त्या जलकुंभात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे स्थानिक महिला व नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक बैलगाडीने तलावातील व शेतशिवारातील पाणी आणून आपली उपजिविका भागवित आहेत. त्यामुळे त्यांचे इतर शेतीविषयक कामकाजावर दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी रोजगाराकडे दुर्लक्ष करावे लागत आहे.तीन मंत्र्यांना निवेदन सादरपोंभूर्णा येथे बचत गटामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महिलांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना देवाडा खुर्द येथील महिलांनी निवेदन सादर केले. त्या निवेदनाच्या प्रती ना. मुनगंटीवार व ना. मुंडे यांनाही देण्यात आल्या.