शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टंचाईमुक्तीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 00:37 IST

तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे.

भीषण टंचाई : अंधारी नदीतून देवाड्याला पाणीलोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील पाच हजार लोकसंख्येच्या देवाडा खुर्द भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सुरू आहे. हे गाव टंचाईमुक्त करण्यासाठी राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांना महिलांनी साकडे घातले. त्यांना निवदनाद्वारे गावात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून बांधलेला जलकुंभ पाण्यासाठी व्याकुळ आहे.देवाडा खुर्द येथील पाणीटंचाई दूर करण्याकरिता पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु अजूनपर्यंत कुठलीच पर्यायी योजना करण्यात आली नाही. देवाडा खुर्दला अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी दिले जाते. या गावाला नदीच्या पात्रात पाणी असेपर्यंतच पाणी मिळते. नदी कोरडी झाली की, पाण्याचा स्रोत बंद होतो. सध्या मे महिना लागण्याआधी अंधारी नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशीच विदारक स्थिती असूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्थायी उपाययोजना केली जात नाही. स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतात आणि निवडून आल्यावर कोठे असतात, हे मतदारांना समजत नाही. ते शोधूनही सापडत नाही. या गावतील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलण्यास कोणीही तयार दिसत नाहीत. पं.स. सदस्या म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या ज्योती बुरांडे या स्वत: या गावात वास्तव्यास आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रश्न लावून धरणे आवश्यक आहे. या गावात पर्यायी व्यवस्था म्हणून लोकसहभागातून भारत ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु त्या योजनेलाही ग्रहण लागले आहे. या योजनेत ५६ लाख रुपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आला. परंतु त्या जलकुंभात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे स्थानिक महिला व नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक बैलगाडीने तलावातील व शेतशिवारातील पाणी आणून आपली उपजिविका भागवित आहेत. त्यामुळे त्यांचे इतर शेतीविषयक कामकाजावर दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी रोजगाराकडे दुर्लक्ष करावे लागत आहे.तीन मंत्र्यांना निवेदन सादरपोंभूर्णा येथे बचत गटामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महिलांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना देवाडा खुर्द येथील महिलांनी निवेदन सादर केले. त्या निवेदनाच्या प्रती ना. मुनगंटीवार व ना. मुंडे यांनाही देण्यात आल्या.