शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

किसान क्रांती समितीचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित

By admin | Updated: June 12, 2017 00:45 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे १२ व १३ जून रोजी सर्वपक्षीय धरणे व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘किसान क्रांती’ नाशिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यातही सगळ्या राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या संघटनेमार्फत विशाल धरणे आंदोलन पंधराही तालुक्यात घेण्यात येणार होते. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांचे समर्थक या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी होणार होते.शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची व सुकाणू समितीच्या सदस्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी करण्यात आली असून व इतर मागण्या बाबत शासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. याबाबतीमध्ये संपूर्ण निर्णय २६ जुलै पूर्वी घेण्यात येईल व ते सकारात्मक राहील, याची ग्वाही ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय झालेला आहे. त्यामुळे सदर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आणि भाजीपाला व दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी देशात पहिल्यांदाच केलेल्या संपामुळे राज्य सरकाराने नांगी टाकली आहे. शेतकऱ्यांची शक्ती काय असते, हे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्याला व देशाला दाखवून दिले आहे. यापुढे होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी अशीच आपली एकी कायम ठेवावी व आत्महत्या न करता, संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यातही भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या समर्थनात लढा दिल्याबद्दल यश आले आहे. त्यामुळे १२ जूनचे धरणे आंदोलन व १३ ला होणारे रेल्वे व रस्ता रोको आंदोलन २६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे, असे नरेश पुगलिया यांनी कळविले आहे. बैठकीत घोषणा होताच गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, गांधी चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.