शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रांती समितीचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित

By admin | Updated: June 12, 2017 00:45 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे १२ व १३ जून रोजी सर्वपक्षीय धरणे व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘किसान क्रांती’ नाशिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यातही सगळ्या राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या संघटनेमार्फत विशाल धरणे आंदोलन पंधराही तालुक्यात घेण्यात येणार होते. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांचे समर्थक या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी होणार होते.शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची व सुकाणू समितीच्या सदस्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी करण्यात आली असून व इतर मागण्या बाबत शासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. याबाबतीमध्ये संपूर्ण निर्णय २६ जुलै पूर्वी घेण्यात येईल व ते सकारात्मक राहील, याची ग्वाही ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय झालेला आहे. त्यामुळे सदर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आणि भाजीपाला व दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी देशात पहिल्यांदाच केलेल्या संपामुळे राज्य सरकाराने नांगी टाकली आहे. शेतकऱ्यांची शक्ती काय असते, हे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्याला व देशाला दाखवून दिले आहे. यापुढे होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी अशीच आपली एकी कायम ठेवावी व आत्महत्या न करता, संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यातही भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या समर्थनात लढा दिल्याबद्दल यश आले आहे. त्यामुळे १२ जूनचे धरणे आंदोलन व १३ ला होणारे रेल्वे व रस्ता रोको आंदोलन २६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे, असे नरेश पुगलिया यांनी कळविले आहे. बैठकीत घोषणा होताच गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, गांधी चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.