शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

किसान क्रांती समितीचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित

By admin | Updated: June 12, 2017 00:45 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हमी भाव द्या व इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान क्रांती नाशिकने घोषित केल्याप्रमाणे १२ व १३ जून रोजी सर्वपक्षीय धरणे व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘किसान क्रांती’ नाशिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यातही सगळ्या राजकीय, सामाजिक व शेतकऱ्यांच्या संघटनेमार्फत विशाल धरणे आंदोलन पंधराही तालुक्यात घेण्यात येणार होते. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांचे समर्थक या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी होणार होते.शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची व सुकाणू समितीच्या सदस्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी करण्यात आली असून व इतर मागण्या बाबत शासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. याबाबतीमध्ये संपूर्ण निर्णय २६ जुलै पूर्वी घेण्यात येईल व ते सकारात्मक राहील, याची ग्वाही ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय झालेला आहे. त्यामुळे सदर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आणि भाजीपाला व दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी देशात पहिल्यांदाच केलेल्या संपामुळे राज्य सरकाराने नांगी टाकली आहे. शेतकऱ्यांची शक्ती काय असते, हे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्याला व देशाला दाखवून दिले आहे. यापुढे होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी अशीच आपली एकी कायम ठेवावी व आत्महत्या न करता, संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यातही भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या समर्थनात लढा दिल्याबद्दल यश आले आहे. त्यामुळे १२ जूनचे धरणे आंदोलन व १३ ला होणारे रेल्वे व रस्ता रोको आंदोलन २६ जुलैपर्यंत स्थगीत करण्यात आले आहे, असे नरेश पुगलिया यांनी कळविले आहे. बैठकीत घोषणा होताच गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून, गांधी चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.