शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कंपनीनिर्मिती उद्योगाचा प्रस्ताव

By admin | Updated: May 8, 2017 00:43 IST

सांसद आदर्श ग्रामातील गावकरी आत्मनिर्भर करण्यासाठी गोपालन व जनावरांच्या संवर्धनासाठी प्रकल्प तयार करण्यात येत आहे.

आदर्शग्राम चंदनखेडा : गावकऱ्यांना येतील सुगीचे दिवसलोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : सांसद आदर्श ग्रामातील गावकरी आत्मनिर्भर करण्यासाठी गोपालन व जनावरांच्या संवर्धनासाठी प्रकल्प तयार करण्यात येत आहे. स्थानिक गावातील उपलब्ध संसाधनाचा वापर करून गावात कंपनी निर्मिती उद्योग उभारणी करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक अनुदान मदतही शासनस्तरावरुन केली जाणार आहे. त्यातून गावाचा चेहरा बदलण्यास मदत होणार आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री व खासदार हंसराज अहीर यांनी चंदनखेडा गाव सांसद आदर्शग्राम म्हणून दत्तक घेतल्यानंतर विविध विभागाच्या योजना प्रथम प्राधान्याने चंदनखेडा गावात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील कुटुंबांना या विकास प्रक्रियेत जोडण्याचा ठोस कार्यक्रम राबविण्यात आला नाही. या योजनेच्या माध्यमातून लोकांना जुळविणे व त्यांच्याच सहभागातून गावात आर्थिक प्रगतीचे वारे वाहतील, अशी आशा आहे. उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून लोकसहभागातून विविध उद्योग उभारणीतून गावकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनी उद्योग निर्मितीस ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. नुकतीच राज्य समन्वयक किरण पटवर्धन यांनी चंदनखेडा येथे भेट देवून कंपनी उद्योगाबाबत माहिती दिली. गावात निर्माण करण्यात येणारा उद्योगगावाच्या कंपनीची शासनस्तरावर संबंधित विभागाकडून कायदेशीर नोंदणी केली जाणार आहे. या निर्मिती उद्योगात गावातील जवळपास ११०० गायी व जनावरांना गावात एकप्रकारे रात्री एका ठिकाणी एकत्रित ठेवल्या जाईल. दुधाळू गार्इंचे दूध संकलित करून उत्पन्न मिळेल. भाकड जनावरांच्या शेणापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येईल. सोबतच गोमूत्र व शेणापासून लघु उत्पादने निर्माण केले जातील. त्यामध्ये शेतकरी गट व महिला बचत गटाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. गावात शेणापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाला नळयोजनेच्या पाणीपुरवठ्याप्रमाणे पाईपलाईन टाकून केवळ मासिक ३० ते ४० रुपयात बायोगॅस उपलब्ध करण्यात येईल. यासाठी गावातील प्रत्येक कुटुंब हे बचत गट असो की, अन्य कोणत्याही यंत्रणेशी नोंदणीकृत जुळणे अपेक्षित आहे.