शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २४ लाख मिळणार

By admin | Updated: November 30, 2015 01:00 IST

१५ वर्षापूर्वी लाल पोथरा कालव्याकरिता शेतजमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २४ लाख मिळणार आहे. जिल्हा समितीला अलीकडेच मंजुरी दिली.

जिल्हा समितीची मंजुरी : लाल पोथरा कालव्यासाठी जमीन संपादित, शेतकऱ्यांना दिलासाचंद्रपूर : १५ वर्षापूर्वी लाल पोथरा कालव्याकरिता शेतजमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २४ लाख मिळणार आहे. जिल्हा समितीला अलीकडेच मंजुरी दिली. यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.वनोजा आणि पांझुर्णी येथील शेतकऱ्यांना हेक्टरी २४ लाख ३७ हजार ५००, तर मारडा येथील शेतकऱ्यांना हेक्टरी १४ लाख रुपयांपेक्षा अधिक मोबदला मिळणार आहे. शेंबळच्या शेतकऱ्यांना हेक्टरी १२ लाख ३७ हजार रुपयांपेक्षा अधिक अशा सुधारित दराने मोबदला मिळणार आहे.शासनाच्या आदेशानुसार स्थापन जिल्हा समितीने एका बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रकल्पग्रस्तांनी निवेदनातून मागणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी समिती स्थापन करून त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. लाल पोथरा या संयुक्त सिंचन प्रकल्पासाठी राज्य शासनाने वर्ष १९९९-२००० मध्ये वरोरा तालुक्यातील पांझुर्णी, शेंबळ, वनोजा, मार्डा यासह अन्य गावातील शेतजमिनी संपादित केल्या होत्या. २००८ मध्ये यासंदर्भात सेक्शन ४ ते ११ पर्यंतची कार्यवाही झाली. परंतु अनेकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.यामुळे शासनाने नवीन धोरण आखून २६ मे २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यात भूमिसंपादनासंदर्भात २०१३ चा नियम रद्द करून प्रकल्प क्षेत्रात २०१५ च्या तीन वर्षापूर्वी झालेली कोणतेही पाच मोठे खरेदी-विक्री व्यवहार गृहीत धरून त्यांच्या येणाऱ्या सरासरीचा दर नियमित करण्याचे आदेश निर्गमित केले. या दराला नंतर दीडने गुणून देणाऱ्या रकमेची दुप्पट रक्कम केली जावी. त्यावर २५ टक्के वाढ द्यावी, अशी एकंदरीत रक्कम शेतकऱ्याला देण्याचे आदेशामध्ये नमूद आहे. याप्रमाणे दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, सिंचन आणि भूमिसंपादन अधिकाऱ्यांची समिती गठण करण्याचे आदेश शासनाने मे २०१५ मध्ये दिले होते. तीन महिने लोटले तरी समिती स्थापन झाली नव्हती. परिणामी शासनाला मोबदला मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून ओम मांडवकर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना समिती गठण करण्याचे निर्देश देण्यात आले. समितीची सभा ६ आॅक्टोबर रोजी पार पडली. यात प्रकल्पग्रस्तांना सुधारित दराने मोबदला देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीनंतर ३० आॅक्टोबर २०१५ रोजी त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोंदीनुसार झाडांची रक्कम वेगळी दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)