शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

जिल्ह्यात धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: September 13, 2015 00:53 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला.

केवळ ७० टक्के रोवण्या : धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीचंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासून मंदगतीने पाऊस सुरू झाला. परिणामी जिल्ह्यात केवळ ७० टक्के रोवणी झाल्या आहे. मात्र रोवणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेण्यात येते, तर वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना या तालुक्यातील काही शेतकरी धानाचे पिक घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. हंगामाच्या सुरूवातीला झालेल्या पावसात पऱ्हे टाकण्यात आले. त्यानंतरही दरमदार पाऊस झाला नाही. अधून-मधून आलेल्या पावसाच्या भरवशावर रोवणी करण्यात आली. पऱ्ह्याची वाढ झाल्याने रोवणी केल्यानंतर पऱ्ह्यातील ताकद दिवसागणिक कमी झाली. रोवणी झाल्यानंतर दमदार पाऊस अपेक्षीत असताना पाऊस झाला नाही. उष्णता मा$$$$$$त्र वाढत असल्याने रोवणी झालेल्या धान पिकाची वाढ झाली नाही. त्याला फांदेही फुटले नाहीत. त्याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर होणार आहे. रोवणीचा हंगाम निघून गेला. जिल्ह्यात ७० टक्के रोवणी झाली. पाऊसच नसल्याने उर्वरित ३० टक्के रोवणी होण्याची शक्यता आता मावळली आहे. रोवणी झालेल्या धान पिकात पावसाअभावी वाढण्याची ताकद नसल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात धान पीक घटण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. (प्रतिनिधी)