शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

संगणकीकरणात अडचणी

By admin | Updated: July 23, 2015 00:48 IST

शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘सरल’ आॅनलाईन डाटाबेस बंधनकारक केले आहे. यात विद्यार्थ्यांचे रक्तगट, आधार क्रमांक नोंदवायचे आहेत.

शिक्षक व शाळा मेटाकुटीस : वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने काम करणे अवघडचंद्रपूर : शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘सरल’ आॅनलाईन डाटाबेस बंधनकारक केले आहे. यात विद्यार्थ्यांचे रक्तगट, आधार क्रमांक नोंदवायचे आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना रक्तगट आणि आधार क्रमांक माहिती नसल्याने तसेच वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शिक्षक आणि शाळा मेटाकुटीला आल्या आहेत. या सर्व समस्यांमुळे सरल डाटाबेसमध्ये माहिती देणे मोठे ‘अवघड’ काम झाले आहे.राज्य शासनाने ३ जुलैला निर्णय जारी करून राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांची माहिती संकलित करण्यासाठी सरल या संगणक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व माहिती एकत्रित करण्यात आल्यानंतर भविष्यात विविध योजना राबविणे, आर्थिक तरतूद करणे व या इतर गोष्टींकरिता त्याचा लाभ होणार आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सध्या सर्व शाळांमध्ये सरल संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ही सर्व जबाबदारी वर्गशिक्षकांवर सोपविण्यात आली असून, मुख्याध्यापकांच्या देखरेखीत हे काम होत आहे. या सर्व प्रक्रियेवर शिक्षणाधिकारी नियंत्रण ठेवून आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत.ग्रामीण भागातील अनेक पालक आपल्या पाल्यांचे रक्तगट तपासत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती नसते. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्याची रक्तगट तपासणी करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शालेय आरोग्य तपासणी पथकाद्वारे रक्तगट तपासणी व गावपातळीवर आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस जे.डी. पोटे, संतोष कुंटावार यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)संगणक, इंटरनेट नाहीजिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये संगणक, इंटरनेट उपलब्ध नाही. त्यातही बऱ्याच मुख्याध्यापकांना संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे सरलची माहिती कशी भरायची, असा प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षकांना पडला आहे. केंद्रस्तरावर ही माहिती भरण्याची कामे केली जावीत, अशी मागणी केली जात आहे.