शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

संगणकीकरणात अडचणी

By admin | Updated: July 23, 2015 00:48 IST

शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘सरल’ आॅनलाईन डाटाबेस बंधनकारक केले आहे. यात विद्यार्थ्यांचे रक्तगट, आधार क्रमांक नोंदवायचे आहेत.

शिक्षक व शाळा मेटाकुटीस : वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने काम करणे अवघडचंद्रपूर : शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘सरल’ आॅनलाईन डाटाबेस बंधनकारक केले आहे. यात विद्यार्थ्यांचे रक्तगट, आधार क्रमांक नोंदवायचे आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना रक्तगट आणि आधार क्रमांक माहिती नसल्याने तसेच वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शिक्षक आणि शाळा मेटाकुटीला आल्या आहेत. या सर्व समस्यांमुळे सरल डाटाबेसमध्ये माहिती देणे मोठे ‘अवघड’ काम झाले आहे.राज्य शासनाने ३ जुलैला निर्णय जारी करून राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांची माहिती संकलित करण्यासाठी सरल या संगणक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व माहिती एकत्रित करण्यात आल्यानंतर भविष्यात विविध योजना राबविणे, आर्थिक तरतूद करणे व या इतर गोष्टींकरिता त्याचा लाभ होणार आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सध्या सर्व शाळांमध्ये सरल संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. ही सर्व जबाबदारी वर्गशिक्षकांवर सोपविण्यात आली असून, मुख्याध्यापकांच्या देखरेखीत हे काम होत आहे. या सर्व प्रक्रियेवर शिक्षणाधिकारी नियंत्रण ठेवून आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी रक्तगट तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत.ग्रामीण भागातील अनेक पालक आपल्या पाल्यांचे रक्तगट तपासत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती नसते. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्याची रक्तगट तपासणी करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शालेय आरोग्य तपासणी पथकाद्वारे रक्तगट तपासणी व गावपातळीवर आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस जे.डी. पोटे, संतोष कुंटावार यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)संगणक, इंटरनेट नाहीजिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये संगणक, इंटरनेट उपलब्ध नाही. त्यातही बऱ्याच मुख्याध्यापकांना संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे सरलची माहिती कशी भरायची, असा प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षकांना पडला आहे. केंद्रस्तरावर ही माहिती भरण्याची कामे केली जावीत, अशी मागणी केली जात आहे.