शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेअभावी नागरिकांना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST

स्वच्छता अभियानाचा उडाला फज्जा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे. गावांमध्ये नाल्या, रस्ते, शौचालय आदी ...

स्वच्छता अभियानाचा उडाला फज्जा

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे. गावांमध्ये नाल्या, रस्ते, शौचालय आदी सुविधा उपलब्ध नाही. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकही उदासीन असल्याचे दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानाचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे, अशी मागणी होत आहे.

मच्छीनाल्याची स्वच्छता करावी

चंद्रपूर : मूल मार्गावरील मच्छीनाल्याचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होत असल्याने नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. महानगरपालिकेने नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्र आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी संचय करण्याची गरज

चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्या मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी

चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे, याच स्टोरमध्ये अनेक कंपन्याचे मोबाइलचेही स्टोर असल्याने त्या कंपनीचे ग्राहकही गर्दी करतात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एक एमआय स्टोर देण्यात यावे, अशी मागणी मोबाइल ग्राहकांकडून केली जात आहे.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांची अडचण

चंद्रपूर : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते. अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवीपासूनच तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे

चंद्रपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहितीही घेत नाही. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एकखिडकी योजना राबवावी

चंद्रपूर : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली, तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एकखिडकी ही योजना राबवून शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबविली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.