शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी

By admin | Updated: April 29, 2016 01:09 IST

शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.

आपचा उपक्रम : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडणार समस्याचंद्रपूर : शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्याकडून निवेदन लिहून घेतले आहे. हे सर्व निवेदन घेऊन आपच्या वतीने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.तत्पूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची सिंचन व योग्य भावाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. उचल केलेले कर्ज व झालेल्या खर्चापायी आत्महत्या करण्याची पाळी बहुसंख्य शेतकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे अनुदान शासनाकडून देण्यात आले नसून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांनासुद्धा झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. पिक विमा योजनेमध्येसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. गोसीखुर्द प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. मौजा एकारा येथे मुख्य गेटची दुरुस्ती व नवीन गेट बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मजगीचे पुनर्जीवनाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावे. शेतातील कामे मग्रारोहयोअंतर्गत सुरु करण्यात यावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव, पुरेशी साठवण व्यवस्था, पूर्ण वेळ वीज पुरवठा, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी, ३० वर्षापासून पट्याने मिळालेल्या जमिनी कसणाऱ्यांना भूमिस्वामीमध्ये रुपांतर करुन देण्यात यावे. वर्ग २ च्या जमीनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर व्हावे, मजुरांना प्रति वर्षी प्रति मजूर १०० दिवस प्रमाणे रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. मग्रारोहयोअंतर्गत प्रलंबित असलेल्या मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात मोबदला देण्यात यावा. वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस आळा बसावा, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता दर्जेदार बियाणे व पुरेशा खताची व्यवस्था करावी व प्रथम शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. शेती आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केवळ घोषणाऐवजी प्रत्यक्ष कृती व परिणाम दिसावा, अशा मागण्या लावून धरण्यात येणार आहे. शेतकरी समस्या जाणून घेण्याकरिता पुरुषोत्तम गेडाम, युवराज नाकतोडे, लिना मस्के, वंदना गजभिये, संदीप धोटे, हिरालाल इंदोरकर, मनोहर पवार, खटुजी गुरनुले, पुष्पा पवार, रामचंद्र सयाम, किशोर गेडाम, सुधीर बाळबुध्दे, क्रीष्णा मानकर, सुंदरशहा सिडाम यांनी परिश्रम घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)