शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी

By admin | Updated: April 29, 2016 01:09 IST

शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.

आपचा उपक्रम : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडणार समस्याचंद्रपूर : शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्याकडून निवेदन लिहून घेतले आहे. हे सर्व निवेदन घेऊन आपच्या वतीने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.तत्पूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची सिंचन व योग्य भावाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. उचल केलेले कर्ज व झालेल्या खर्चापायी आत्महत्या करण्याची पाळी बहुसंख्य शेतकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे अनुदान शासनाकडून देण्यात आले नसून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांनासुद्धा झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. पिक विमा योजनेमध्येसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. गोसीखुर्द प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. मौजा एकारा येथे मुख्य गेटची दुरुस्ती व नवीन गेट बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मजगीचे पुनर्जीवनाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावे. शेतातील कामे मग्रारोहयोअंतर्गत सुरु करण्यात यावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव, पुरेशी साठवण व्यवस्था, पूर्ण वेळ वीज पुरवठा, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी, ३० वर्षापासून पट्याने मिळालेल्या जमिनी कसणाऱ्यांना भूमिस्वामीमध्ये रुपांतर करुन देण्यात यावे. वर्ग २ च्या जमीनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर व्हावे, मजुरांना प्रति वर्षी प्रति मजूर १०० दिवस प्रमाणे रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. मग्रारोहयोअंतर्गत प्रलंबित असलेल्या मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात मोबदला देण्यात यावा. वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस आळा बसावा, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता दर्जेदार बियाणे व पुरेशा खताची व्यवस्था करावी व प्रथम शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. शेती आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केवळ घोषणाऐवजी प्रत्यक्ष कृती व परिणाम दिसावा, अशा मागण्या लावून धरण्यात येणार आहे. शेतकरी समस्या जाणून घेण्याकरिता पुरुषोत्तम गेडाम, युवराज नाकतोडे, लिना मस्के, वंदना गजभिये, संदीप धोटे, हिरालाल इंदोरकर, मनोहर पवार, खटुजी गुरनुले, पुष्पा पवार, रामचंद्र सयाम, किशोर गेडाम, सुधीर बाळबुध्दे, क्रीष्णा मानकर, सुंदरशहा सिडाम यांनी परिश्रम घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)