शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खासगी ट्रॅव्हल्स अडविल्या

By admin | Updated: November 30, 2015 00:56 IST

चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या विना परवान्याने मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स धावत आहे.

काळी-पिवळी चालकांचा आरोप : विना परवाना धावत आहेत ट्रॅव्हल्सवरोरा : चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या विना परवान्याने मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स धावत आहे. त्यामुळे काळीपिवळी चालविणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्या निषेधार्थ मागील पाच दिवसांपासून काळीपिवळी चालकांनी आपली वाहने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बंद ठेवली. परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नसल्याने आज रविवारी चिमूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वरोरा येथील रत्नमाला चौकात काळीपिवळी वाहन चालकांनी रोखून धरल्या होत्या. काही वेळानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ट्रॅव्हल्स रवाना केल्या.चंद्रपूर-चिमूर मार्गावरील मागील काही वर्षापासून १२ ट्रॅव्हल्स धावत आहे तर वरोरा-चिमूर मार्गावर २० काळपिवळी वाहने धावत आहे. काळीपिवळी वाहने शासनाने बेरोजगारी कमी करण्याकरिता सुशिक्षित युवकांना सबसिडीवर देऊन त्याकरिता कर्जही दिले आहे. प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना काळीपिवळी वाहनास शासनाने दिला असल्याने काळीपिवळी वाहनात प्रवासी बसवून मागील काही वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार आपली उपजीविका करीत आहे. असे असताना चंद्रपूर-चिमूर मार्गावर मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहे. खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना कमी पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या वाहनात बसवून नेत आहे. चंद्रपूर-चिमूर मार्गावर चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नाही. टप्पा प्रवासी घेता येत नाही. असे असताना प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून मागील काही वर्षापासून चिमूर-चंद्रपूर मार्गावर १२ खाजगी ट्रॅव्हल्स राजरोसपणे चालू आहे. विना परवान्याने धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बंद कराव्यात, या मागणीकरिता वरोरा चिमूर मार्गावर चालणाऱ्या २० काळीपिवळी वाहने मागील पाच दिवसांपासून बंद ठेवीत आज ट्रॅव्हल्स रोखून धरल्या. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)परवाना नसल्याचे माहिती अधिकारात उघडचंद्रपूर-चिमूर मार्गावर चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे क्रमांक देऊन प्रवासी वाहतूकीचा परवाना आहे किंवा नाही याची माहिती माहितीच्या अधिकारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे मागण्यात आली. त्यात एकाही खाजगी ट्रॅव्हल्सला चंद्रपूर-चिमूर मार्गावर प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याची माहिती देण्यात आली. परंतु उपप्रादेशिक विभागाचे आजपावेतो कार्यवाही केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.काळीपिवळी चालकांचे शासनाकडे हमीपत्रकाळीपिवळी वाहन सुशिक्षीत बेरोजगारांना शासनाने अर्थसहाय घेवून दिल्या. त्यासोबतच १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर मी नोकरी करणार नाही, असे हमीपत्रही शासनाने घेतले. त्यामुळे काळीपिवळी वाहने घेणाऱ्यांना इतर व्यवसायाकरिता कर्ज व नौकरी मिळणार नाही. त्यामुळे याच व्यवसायावर आत्मनिर्भर राहताना खासगी ट्रॅव्हल्समुळे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे काळीपिवळी वाहन चालक मालकासमोर आव्हान उभे ठाकले आहे.एसटीलाही फटकावरोरा-चिमूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स धावत असताना ते कमी दरात प्रवाश्यांना घेऊन जात असल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सची वाट बघतात. याचा फटका एसटी बसलाही बसत असल्याचे दिसून येत आहे.