शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोहळी समाजातील विवाह संस्कारात जमिनीच्या सातबार्‍याला प्राधान्य

By admin | Updated: May 31, 2014 23:24 IST

दुर्गम भागात शेती व्यवसाय करणार्‍या कोहळी समाजातील विवाह संस्कारात वर पक्षाकडे जमिनीच्या सातबार्‍याला प्राधान्य दिल्या जात असल्यामुळे ज्यांच्या सातबार्‍यावर जमीन कमी आहे किंवा सातबारा कोरा आहे,

तळोधी (बा) : दुर्गम भागात शेती व्यवसाय करणार्‍या कोहळी समाजातील विवाह संस्कारात वर पक्षाकडे जमिनीच्या सातबार्‍याला प्राधान्य दिल्या जात असल्यामुळे ज्यांच्या सातबार्‍यावर जमीन कमी आहे किंवा सातबारा कोरा आहे, अशांना कोहळी समाजात लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे या समाजातील उपवर मुले लग्नाविना असून इतर समाजातील मुलींशी लग्न करण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती तळोधी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वाढोणा येथील कोहळी समाजाचे प्रमुख विकास झोडे यांनी दिली. पश्‍चिम विदर्भात वास्तव्याला असलेल्या कोहळी समाजाने शेती व्यवसायात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले असून विवाहासारख्या प्रवित्र कार्यक्रमप्रसंगी लग्नपत्रिकेतील वेळेचे भान राखून घड्याळाच्या काट्याचे तंतोतंत पालन करून वेळेचे महत्व पाळणारा समाज म्हणून ओळख आहे व लग्न कार्यात तंतोतंत वेळेचे भान राखण्याची त्यांची सवय इतर समाजासाठीच नव्हे तर देशातील समस्त क्षेत्रातील व्यक्तींना आदर्श म्हणून जीवनात पालन करण्यास लावणारी आहे.या समाजाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे अजुनही या समाजात हुंडा पद्धती रूजली नाही. समाजातील अनेक लग्ने हुंड्याविना जुळलेली आहेत. इतकेच नव्हे तर विवाहासाठी मुली बघतानासुद्धा ते वेळेचा अपव्यय करीत नाहीत. मुली बघायला निघालेली मंडळी एकाच फेरीतच माहित असलेल्या मुली बघुन निर्णय घेतात व लग्न जुळतात. असे अनेक वैशिष्टये असलेला समाज मात्र मुलगी देताना मुलाकडे असलेला शेत जमिनीचा सातबाराचा उतारा अवश्य बघतात. ते मुलाची संपत्ती त्याच्याकडील जमिनीवरच ठरवतात. ज्यांच्याकडे सातबारा नाही किंवा शेतउतारा कमी आहे. अशा सुशिक्षित व सुसंपन्न मुलाला मात्र लग्नाच्या बाजारात भाव मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोहळी समाजात विवाहाच्या प्रतिक्षेत असलेले अनेक उपवर मुले उपवर मुलीच्या शोधात दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या समाजातील अनेक मुलांकडे सातबारा नसल्याने किंवा जमीन नसल्याने त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने ते इतर समाजातील मुलीशी लग्न करण्यास तयार असल्याचे अनेक उपवर मुलांनी सांगितले. तळोधी (बा) परिसरातील वाढोणा, सावरगाव, उश्राळमेंढा हेटी, नवरगाव, रत्नापूर या गावात अनेक उपवर मुले लग्नाकरीता मुलीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. (वार्ताहर)