शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा

By admin | Updated: March 27, 2017 00:42 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

धान उत्पादकांची मागणी : राबराब राबूनही आर्थिक संकटनागभीड : धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.नागभीड तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानपिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असे असले तरी या पिकाच्या संवर्धनासाठी सिंचनाच्या कोणत्याही सोयी या तालुक्यात नाहीत. जवळपास ९० टक्के शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. नागभीड तालुक्यात घोडाझरी तलाव केवळ नावाला आहे. या तलावाचा बहुतांश फायदा सिंदेवाही तालुक्याला होत आहे. कसर्ला तलाव नागभीड तालुक्यात आहे. पण त्याची सिंचन मर्यादा मर्यादित आहे. नागभीड तालुक्यातील भातशेती सर्वार्थाने नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.या सर्व परिस्थितीवर मात करून नागभीड तालुक्यातील शेतकरी धानाचे पीक घेत आहे. परवडत नसले तरी कर्ज काढून या तालुक्यातील शेतकरी आपले परंपरागत कर्तव्य निभावत आहे. मात्र शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शिरावर कर्जाचे डोंगर चढत आहेत.नागभीड तालुक्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे.सर्व संकटावर मात करून शेतकरी जे काही उत्पन्न घेतो आणि नंतर बाजारात त्याची विक्री करतो. तेव्हा त्याला जे भाव मिळते ते अतिशय कवडीमोल असते. गेल्या १० वर्षात मजुरीत, खताच्या किंमतीने दशपटीने वाढ झाली असली तरी धानाच्या किंमतीत झालेली वाढ अतिशय नगण्य आहे. आलेल्या उत्पन्नातून झालेला खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे. त्यामुळे धानाला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)