शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा

By admin | Updated: March 27, 2017 00:42 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

धान उत्पादकांची मागणी : राबराब राबूनही आर्थिक संकटनागभीड : धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.नागभीड तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानपिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असे असले तरी या पिकाच्या संवर्धनासाठी सिंचनाच्या कोणत्याही सोयी या तालुक्यात नाहीत. जवळपास ९० टक्के शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. नागभीड तालुक्यात घोडाझरी तलाव केवळ नावाला आहे. या तलावाचा बहुतांश फायदा सिंदेवाही तालुक्याला होत आहे. कसर्ला तलाव नागभीड तालुक्यात आहे. पण त्याची सिंचन मर्यादा मर्यादित आहे. नागभीड तालुक्यातील भातशेती सर्वार्थाने नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.या सर्व परिस्थितीवर मात करून नागभीड तालुक्यातील शेतकरी धानाचे पीक घेत आहे. परवडत नसले तरी कर्ज काढून या तालुक्यातील शेतकरी आपले परंपरागत कर्तव्य निभावत आहे. मात्र शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शिरावर कर्जाचे डोंगर चढत आहेत.नागभीड तालुक्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे.सर्व संकटावर मात करून शेतकरी जे काही उत्पन्न घेतो आणि नंतर बाजारात त्याची विक्री करतो. तेव्हा त्याला जे भाव मिळते ते अतिशय कवडीमोल असते. गेल्या १० वर्षात मजुरीत, खताच्या किंमतीने दशपटीने वाढ झाली असली तरी धानाच्या किंमतीत झालेली वाढ अतिशय नगण्य आहे. आलेल्या उत्पन्नातून झालेला खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे. त्यामुळे धानाला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)